शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

शेतकरी आंदोलन : अमित शाहंनी सांभाळला मोर्चा; म्हणाले - सरकार तत्काळ चर्चेसाठी तयार, पण...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 28, 2020 20:19 IST

अमित शाह म्हणाले, पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर वेग-वेगळ्या शेतकरी संघटनांच्या आवाहनावरून आज जे शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, की भारत सरकार आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहे. 

ठळक मुद्देकृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 3 डिसंबरला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले आहे.कृषी कयदे परत घ्यावेत, अशी मागणी करत शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली हरियाणा बॉर्डरपर्यंत हे शतकरी आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रसत्यावर उतरला आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी आता गृह मंत्री अमित शाह यांनी संदेश दिला आहे. शाह यांनी म्हटले आहे, की शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आणि मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 3 डिसंबरला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले आहे.

अमित शाह म्हणाले, पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर वेग-वेगळ्या शेतकरी संघटनांच्या आवाहनावरून आज जे शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, की भारत सरकार आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहे. 

कृषी कयदे परत घ्यावेत, अशी मागणी करत शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली हरियाणा बॉर्डरपर्यंत हे शतकरी आंदोलन करत आहेत. एवढेच नाही, तर या शेतकऱ्यांनी जंतरमंतरवर आंदोलन करू देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही केली आहे. मात्र, सरकारने त्यांना दिल्लीतील बुराडी येथील निरंकारी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांना ती मान्य नाही. ते सिंधू बॉर्डरवर आपले आंदोलन करत आहेत.

शाह म्हणाले, भारत सरकारने लवकरात लवकर चर्चा करावी, 3 डिसेंबरपूर्वी चर्चा करावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा असेल, तर मी आपल्याला आश्वासन देतो, की आपण निर्धारित ठिकाणी स्थलांतरित होताच, दुसऱ्या दिवशी भारत सरकार आपल्या समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यास तयार आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर शेतकरी बांधव आपले ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एवढ्या थंडीत उघड्यावर बसले आहेत. या सर्वांना मी आवाहन करतो, की दिल्ली पोलीस आपणा सर्वांना एका मोठ्या मैदानावर स्थलांतरित करण्यास तयार आहेत. जेथे आपल्याला सुरक्षा व्यवस्था आणि सुविधा मिळतील, असे शाह म्हणाले.

तसेच आपण रोडऐवजी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी आपले धरणे आंदोलन शांततामय आणि लोकशाही पद्धतीने कराल, तर शेतकरी आणि ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांनाही त्रास होणार नाही, असेही शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाFarmerशेतकरी