शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

शेतकरी आंदोलन : अमित शाहंनी सांभाळला मोर्चा; म्हणाले - सरकार तत्काळ चर्चेसाठी तयार, पण...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 28, 2020 20:19 IST

अमित शाह म्हणाले, पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर वेग-वेगळ्या शेतकरी संघटनांच्या आवाहनावरून आज जे शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, की भारत सरकार आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहे. 

ठळक मुद्देकृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 3 डिसंबरला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले आहे.कृषी कयदे परत घ्यावेत, अशी मागणी करत शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली हरियाणा बॉर्डरपर्यंत हे शतकरी आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रसत्यावर उतरला आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी आता गृह मंत्री अमित शाह यांनी संदेश दिला आहे. शाह यांनी म्हटले आहे, की शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आणि मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 3 डिसंबरला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले आहे.

अमित शाह म्हणाले, पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर वेग-वेगळ्या शेतकरी संघटनांच्या आवाहनावरून आज जे शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, की भारत सरकार आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहे. 

कृषी कयदे परत घ्यावेत, अशी मागणी करत शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली हरियाणा बॉर्डरपर्यंत हे शतकरी आंदोलन करत आहेत. एवढेच नाही, तर या शेतकऱ्यांनी जंतरमंतरवर आंदोलन करू देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही केली आहे. मात्र, सरकारने त्यांना दिल्लीतील बुराडी येथील निरंकारी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांना ती मान्य नाही. ते सिंधू बॉर्डरवर आपले आंदोलन करत आहेत.

शाह म्हणाले, भारत सरकारने लवकरात लवकर चर्चा करावी, 3 डिसेंबरपूर्वी चर्चा करावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा असेल, तर मी आपल्याला आश्वासन देतो, की आपण निर्धारित ठिकाणी स्थलांतरित होताच, दुसऱ्या दिवशी भारत सरकार आपल्या समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यास तयार आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर शेतकरी बांधव आपले ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एवढ्या थंडीत उघड्यावर बसले आहेत. या सर्वांना मी आवाहन करतो, की दिल्ली पोलीस आपणा सर्वांना एका मोठ्या मैदानावर स्थलांतरित करण्यास तयार आहेत. जेथे आपल्याला सुरक्षा व्यवस्था आणि सुविधा मिळतील, असे शाह म्हणाले.

तसेच आपण रोडऐवजी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी आपले धरणे आंदोलन शांततामय आणि लोकशाही पद्धतीने कराल, तर शेतकरी आणि ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांनाही त्रास होणार नाही, असेही शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाFarmerशेतकरी