शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
7
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
8
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
9
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
10
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
11
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
12
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
13
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
14
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
15
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
16
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
17
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
18
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
19
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
20
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

शेतकरी आंदोलन : अमित शाहंनी सांभाळला मोर्चा; म्हणाले - सरकार तत्काळ चर्चेसाठी तयार, पण...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 28, 2020 20:19 IST

अमित शाह म्हणाले, पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर वेग-वेगळ्या शेतकरी संघटनांच्या आवाहनावरून आज जे शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, की भारत सरकार आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहे. 

ठळक मुद्देकृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 3 डिसंबरला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले आहे.कृषी कयदे परत घ्यावेत, अशी मागणी करत शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली हरियाणा बॉर्डरपर्यंत हे शतकरी आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रसत्यावर उतरला आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी आता गृह मंत्री अमित शाह यांनी संदेश दिला आहे. शाह यांनी म्हटले आहे, की शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आणि मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 3 डिसंबरला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले आहे.

अमित शाह म्हणाले, पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली-हरियाणा बॉर्डरवर वेग-वेगळ्या शेतकरी संघटनांच्या आवाहनावरून आज जे शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो, की भारत सरकार आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहे. 

कृषी कयदे परत घ्यावेत, अशी मागणी करत शेतकरी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली हरियाणा बॉर्डरपर्यंत हे शतकरी आंदोलन करत आहेत. एवढेच नाही, तर या शेतकऱ्यांनी जंतरमंतरवर आंदोलन करू देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही केली आहे. मात्र, सरकारने त्यांना दिल्लीतील बुराडी येथील निरंकारी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांना ती मान्य नाही. ते सिंधू बॉर्डरवर आपले आंदोलन करत आहेत.

शाह म्हणाले, भारत सरकारने लवकरात लवकर चर्चा करावी, 3 डिसेंबरपूर्वी चर्चा करावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा असेल, तर मी आपल्याला आश्वासन देतो, की आपण निर्धारित ठिकाणी स्थलांतरित होताच, दुसऱ्या दिवशी भारत सरकार आपल्या समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यास तयार आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर शेतकरी बांधव आपले ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एवढ्या थंडीत उघड्यावर बसले आहेत. या सर्वांना मी आवाहन करतो, की दिल्ली पोलीस आपणा सर्वांना एका मोठ्या मैदानावर स्थलांतरित करण्यास तयार आहेत. जेथे आपल्याला सुरक्षा व्यवस्था आणि सुविधा मिळतील, असे शाह म्हणाले.

तसेच आपण रोडऐवजी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी आपले धरणे आंदोलन शांततामय आणि लोकशाही पद्धतीने कराल, तर शेतकरी आणि ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांनाही त्रास होणार नाही, असेही शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाFarmerशेतकरी