शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

पाच महिने, 1500 किमी प्रवास; शेतकऱ्याची हरविलेल्या मुलासाठी सायकलवरून शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2017 2:21 PM

हथरस जिल्ह्यात राहणारे सतिश चंद हे 48 वर्षीय शेतकरी आपल्या मुलाचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्दे हथरस जिल्ह्यात राहणारे सतिश चंद हे 48 वर्षीय शेतकरी आपल्या मुलाचा शोध घेत आहेत.सहा महिन्यापूर्वी सतिश यांचा अकरा वर्षीय दिव्यांग मुलगा अचानक बेपत्ता झाला आहे.

आगरा- हथरस जिल्ह्यात राहणारे सतिश चंद हे 48 वर्षीय शेतकरी आपल्या मुलाचा शोध घेत आहेत. सहा महिन्यापूर्वी सतिश यांचा अकरा वर्षीय दिव्यांग मुलगा अचानक बेपत्ता झाला आहे. त्या मुलाला शोधण्यासाठी सतिश यांनी सायकलवरून शोधमोहीम सुरू केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची मदत न घेता अजूनही सतिश यांची ही शोधमोहीम सुरू आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

चंद यांनी दिल्ली आणि हरियाणातील विविध भागात सायकलीवर जाऊन मुलाचा शोध घेतला. अजूनही विविध भागात त्यांचा सायकलीवरून प्रवास सुरू आहे. आम्ही हथरस जिल्ह्यातील द्वारकापूर या गावातील राहणारे आहोत. 24 जून रोजी गोडना हा माझा मुलागा शाळेत जाण्यासाठी घरातून निघाला. शाळा घरापासून एक किलोमीटर दूर आहे. शाळेत गेलेला मुलगा संध्याकाळी घरी आला नाही. म्हणून मी त्याला शोधण्यासाठी शाळेत गेलो पण तो तेथे नव्हता. सस्नी रेल्वे स्टेशनच्या जवळ गोडनाला पाहिलं असल्याचं त्याच्या वर्गमित्रांनी सांगितलं.मी तेथेही जाऊन पाहिलं पण मला तो दिसला नाही.  चार दिवस मी स्वतः त्याचा शोध घेतल्यानंतर शेवटी 28 जून रोजी पोलीस स्टेशन गाठलं. पण तेथे गेल्यावर पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिला. माझ्या सततच्या विनंती नंतर त्यांनी तक्रार नोंदवून घेतली व मला जाण्यास सांगितलं. पण मला स्वस्थ बसवत नसल्याने मी माझी सायकल काढून मुलाचा शोध सुरू केला. रस्त्याने जाताना प्रत्येकाला मुलाचा फोटो दाखवून मुलाबद्दलची विचारणा केली. माझ्याकडे पैसे कमी आहेत तसंच योग्य सोयी नाहीत. त्यामुळे मदत कोण करणार ? हा मोठा प्रश्न आहे. 

चंद यांनी आत्तापर्यंत सायकलवरून 1500 किमीचा प्रवास केला आहे. दिल्लीपासून ते कानपूरपर्यंत आणि हरियाणातील रेवारीमध्ये त्यांनी मुलाला शोधलं. पण अजून त्यांच्या हाती काहीही लागलं नाही. आत्तापर्यंत 100 गावं पालथी घातली आणि मुलाचा फोटो हजारापेक्षा जास्त स्थानिकांना दाखविला, असं सतिश चंद म्हणाले आहेत. इतमादपूरमध्ये असलेल्या बरहान गावातील काही नागरिकांनी एका व्यक्तीला हातात मुलाचा फोटो घेऊन सायकलवरून जाताना पाहिलं होतं. सतिश चंद यांची ही कहाणी आगऱ्यातील एका बाल हक्क कार्यकर्ते नरेश पारस यांच्याकडे पोहचली. चंद यांची तक्रार नरेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून यूपी पोलिसांच्या लक्षात आणून दिली. यानंतर चंद यांच्या तक्रारीसाठी उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुलाच्या शोधासाठी आदेश दिले. 

मुलाला शोधण्यासाठी या पद्धतीचा का अवलंब केला असा प्रश्न लोक मला विचारत आहेत. पण मुलाला गमावण्याचं दुःख त्यांना समजत नाहीये. माझी पत्नी अजूनही मुलाच्या प्रतिक्षेत आहे. 2005मध्ये आजारपणाने आमच्या मोठ्या मुलीचं निधन झालं. त्यानंतर 2011मध्ये एका अपघातात आमच्या नऊ वर्षाच्या मुलाचं निधन झालं. आता गोडना हा एकुलता एक आसरा होता. त्यामुळे त्याच्याशिवाय कसं जगायचं? हा प्रश्न आम्हाला सतावतो आहे, अशी भावना सतिश चंद यांनी व्यक्त केली आहे. 

चंद यांनी काही जिल्ह्यामध्ये मुलगा हरविल्याची पत्रकं दिली आहेत. तसंच तेथिल चहा विक्रेत, रेल्वे स्टेशन, बस स्टॉपच्या बाजूला असणाऱ्या दुकानदारांचे नंबर घेतले आहेत. मुलगा सापडल्याचा फोन कोणीतरी करेलच याची अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.