शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

video: "शेतकरी युद्ध लढायला नाही, हक्क मागायला येत आहेत", AAP ची केंद्रावर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 13:46 IST

शेतकऱ्यांच्या 'चलो दिल्ली' मोर्चामुळे दिल्लीच्या सीमेवर काटेरी तार, सिमेंट स्लॅब, लोखंडी खिळे लावण्यात आले आहेत.

Farmers Protest Latest News: शेतकरी संघटनांच्या 'चलो दिल्ली' मोर्चाबाबत हरियाणा आणि दिल्लीतील पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. मंगळवार(दि.13) रोजी होणारा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी सिंघू आणि गाझीपूरसह दिल्लीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. या सीमांवर काँक्रीटचे स्लॅब, रस्त्यावर टोकदार खिळे आणि काटेरी तारा लावण्यात आल्या आहेत. यावरुन आम आदमी पक्षाने (AAP) केंद्र आणि हरियाणा सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सिंधू सीमेसह बहुतांश जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातूनही प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. यावरुन आपने सरकारवर बोचरी टीका केली. "शेतकऱ्यांची इतकी भिती का? शेतकरी युद्ध लढायला नाही, आपला हक्क मागायला येत आहेत," असे आपने म्हटले आहे. 

दिल्लीत अशी सुरक्षा व्यवस्था'दिल्ली चलो' मोर्चाला लक्षात घेऊन दिल्लीपासून हरियाणापर्यंतच्या सीमेवर नाकाबंदी वाढवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी सीमा बंद केल्याचीही माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी गाझीपूर बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि सिंघू बॉर्डरवर कलम 144 लागू केले आहे. दिल्लीला हरियाणा आणि यूपीशी जोडणाऱ्या तिन्ही प्रमुख सीमांवरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सीमेवर काटेरी तार, सिमेंट स्लॅब, लोखंडी खिळे लावण्यात आले आहेत. या सीमांचे किल्ल्यात रुपांतर झाले आहे.

राजधानीत 1 महिन्यासाठी कलम-144दिल्ली पोलिसांनी संपूर्ण दिल्लीत कलम 144 लागू केले आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा म्हणाले की, किसान मोर्चाच्या दिल्ली चलो मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 12 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत कलम 144 लागू राहणार आहे. या अंतर्गत लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी असेल. तसेच कोणत्याही प्रकारची निदर्शने आणि रॅली काढण्यास बंदी असेल. सीमेवरून ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या प्रवेशावरही बंदी असेल. कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेशही दिल्ली पोलिसांनी दिले आहेत.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?MSP साठी कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामुळे हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाAAPआप