शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

video: "शेतकरी युद्ध लढायला नाही, हक्क मागायला येत आहेत", AAP ची केंद्रावर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 13:46 IST

शेतकऱ्यांच्या 'चलो दिल्ली' मोर्चामुळे दिल्लीच्या सीमेवर काटेरी तार, सिमेंट स्लॅब, लोखंडी खिळे लावण्यात आले आहेत.

Farmers Protest Latest News: शेतकरी संघटनांच्या 'चलो दिल्ली' मोर्चाबाबत हरियाणा आणि दिल्लीतील पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. मंगळवार(दि.13) रोजी होणारा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी सिंघू आणि गाझीपूरसह दिल्लीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. या सीमांवर काँक्रीटचे स्लॅब, रस्त्यावर टोकदार खिळे आणि काटेरी तारा लावण्यात आल्या आहेत. यावरुन आम आदमी पक्षाने (AAP) केंद्र आणि हरियाणा सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सिंधू सीमेसह बहुतांश जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातूनही प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. यावरुन आपने सरकारवर बोचरी टीका केली. "शेतकऱ्यांची इतकी भिती का? शेतकरी युद्ध लढायला नाही, आपला हक्क मागायला येत आहेत," असे आपने म्हटले आहे. 

दिल्लीत अशी सुरक्षा व्यवस्था'दिल्ली चलो' मोर्चाला लक्षात घेऊन दिल्लीपासून हरियाणापर्यंतच्या सीमेवर नाकाबंदी वाढवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी सीमा बंद केल्याचीही माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी गाझीपूर बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि सिंघू बॉर्डरवर कलम 144 लागू केले आहे. दिल्लीला हरियाणा आणि यूपीशी जोडणाऱ्या तिन्ही प्रमुख सीमांवरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सीमेवर काटेरी तार, सिमेंट स्लॅब, लोखंडी खिळे लावण्यात आले आहेत. या सीमांचे किल्ल्यात रुपांतर झाले आहे.

राजधानीत 1 महिन्यासाठी कलम-144दिल्ली पोलिसांनी संपूर्ण दिल्लीत कलम 144 लागू केले आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा म्हणाले की, किसान मोर्चाच्या दिल्ली चलो मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 12 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत कलम 144 लागू राहणार आहे. या अंतर्गत लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी असेल. तसेच कोणत्याही प्रकारची निदर्शने आणि रॅली काढण्यास बंदी असेल. सीमेवरून ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या प्रवेशावरही बंदी असेल. कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेशही दिल्ली पोलिसांनी दिले आहेत.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?MSP साठी कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामुळे हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाAAPआप