शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

शेतकरी आंदोलनाला वेगळं वळण, राकेश टिकैत यांनी व्यक्त केली केंद्राशी चर्चा करण्याची इच्छा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 16:18 IST

सरकारने 18 महिने कायदा स्थगित करण्याचा दिलेला प्रस्ताव मान्य करणार का? टिकैत म्हणाले...

ठळक मुद्देटिकैत यांनी सरकारकडे चर्चेची इच्छा व्यक्त केल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता बॉर्डरवर सकाळपासून नेते मंडळींची वर्दळ सुरू आहे.राकेश टिकैत यांनी अरविंद केजरीवालांचे मानले आभार

नवी दिल्ली - गाझीपूर बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा सरकारबरोबर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बॉर्डरवर सकाळपासून नेते मंडळींची वर्दळ सुरू आहे. अशात टिकैत यांनी सरकारकडे चर्चेची इच्छा व्यक्त केल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. याच बरोबर टिकैत यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही आभार मानले आहेत.

भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत बॉर्डरवर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कृषी कायद्यांसंदर्भात आम्ही पुन्हा एकदा सरकारशी चर्चा करू. जो आमचा मार्ग आहेत, त्याच्यावर चर्चा करू. यासंदर्भात आम्ही सरकारला निरोप पाठविला आहे, की आमची भारत सरकारबरोबर चर्चा करण्याची इच्छा आहे.

सरकारी नोकरीवर लाथ ते ४४ वेळा जेलवारी; मोदी सरकारला जेरीस आणणारे राकेश टिकैत कोण आहेत?

सरकारने 18 महिने कायदा स्थगित करण्याचा दिलेला प्रस्ताव मान्य करणार का? यावर टिकैत म्हणाले, नाही नाही, आम्ही पुन्हा सरकारशी चर्चा करू. टिकैत यांनी दिलेल्या या वक्तव्यानंतर, आता सरकारकडून काय उत्तर येते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, प्रजासत्ताक दिनी झालेला हिंसाचारनंतर आंदोलनात अनेक चढ-उतार बघायला मिळाले आहेत. खरे तर यापूर्वी सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात कृषी कायद्यांवर तब्बल 11 वेळा चर्चा झाली आहे. मात्र, या सर्वच चर्चा निष्फळ ठरल्या.

राकेश टिकैत यांनी अरविंद केजरीवालांचे मानले आभार -टिकैत म्हणाले, आम्ही प्रशासनाला सांगत आहोत, की सर्व सुविधा सुरू करा. आमचा संघर्ष केंद्र सरकारबरोबर आहे. आम्ही सरकारसोबत चर्चा करू. आंदोलन पूर्ण झाल्यानंतर शेतकरी सन्मानाने घरी जातील. आम्ही अरविंद केजरीवाल यांचे आभार मानतो. ही सर्वसामान्य नागरिकांची लढाई आहे.

Farmer Protest: ...अन् 'त्या' घटनेनं वातावरण बदललं; ट्रॅक्टर घेऊन रातोरात शेकडो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर

उत्तर प्रदेश सरकारच्या शेतकऱ्यांना नोटिसाकृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांकडून शांततेचा भंग होण्याच्या भीतीने उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक जातमुचलक्याच्या नोटीस पाठविल्या आहेत. याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला याबाबत २ फेब्रुवारीपर्यंत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. 

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhi violenceदिल्लीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारArvind Kejriwalअरविंद केजरीवालyogi adityanathयोगी आदित्यनाथ