शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी नेते राहुल गांधींच्या भेटीला; लोकसभेतील दालनात जाण्यास मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 07:20 IST

शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे राहुल गांधी यांनी शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: शेतकऱ्यांना किमान हमी भावासाठी (एमएसपी) कायदेशीर हमी मिळावी, यासाठी इंडिया आघाडी केंद्र सरकारवर दबाव आणणार असल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले, त्यांची शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी संसद संकुलात भेट घेतली. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटकमधील शेतकरी नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे राहुल गांधी यांनी शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी, पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वारिंग, काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधवा, गुरुजितसिंग औजला, धरमवीर गांधी, अमरसिंग, दीपेंदरसिंग हुडा, जयप्रकाश हे उपस्थित होते. या शिष्टमंडळात १२ शेतकरी नेत्यांचा समावेश होता.

'शेतकरी नेत्यांना विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात जाण्यास प्रतिबंध'शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाला लोकसभा विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात आम्ही चर्चेसाठी बोलाविले होते; पण त्यांना तिथे येऊ देण्यास सरकारी यंत्रणेने प्रतिबंध केला आहे. कदाचित ते शेतकरी असल्याने असा पवित्रा घेण्यात आला असावा, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

तरुणांना खोटी आश्वासने दिली गेली"तरुणांना खोटी आश्वासने देण्यात आली." अशी टीका सपा खासदार जया बच्चन यांनी केली. 'उत्तर प्रदेशबाबत भेदभाव केला जात आहे. त्यांनी नोकऱ्या हिसकावून घेतल्या आणि आता शिकाऊ उमेदवारीबद्दल बोलत आहेत, अशी टीका सपा प्रमुख अखिलेश यादव यानी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरी