शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात उत्तर द्या; शेतकरी संघटनांची रोखठोक भूमिका

By मोरेश्वर येरम | Updated: December 5, 2020 17:33 IST

सरकार आणि शेतकरी आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशात शेतकऱ्यांनी "आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात काय ते उत्तर द्या", अशी भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आज पाचवी बैठककृषी कायदे रद्द करण्याचा भूमिकेवर शेतकरी ठामकृषी कायदे रद्द करत असल्याचं सरकारने लेखी द्यावं, शेतकऱ्यांची भूमिका

नवी दिल्लीकृषी कायद्यांवरुन केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता आणखी शिगेला पोहोचला आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये दिल्लीच्या विज्ञान भवनात पाचवी बैठक सुरू आहे. या बैठकीतही सरकार आणि शेतकरी आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशात शेतकऱ्यांनी "आता चर्चा खूप झाली, लेखी स्वरुपात काय ते उत्तर द्या", अशी भूमिका घेतली आहे.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसमोर कृषी कायद्यातील संशोधनाबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सरकारचा हा संशोधनाबाबतचा प्रस्ताव देखील साफ फेटाळून लावला आहे. कृषी कायदे पूर्णपणे रद्द करण्याच्या भूमिकेवर शेतकरी नेते ठाम आहेत. 

"आतापर्यंत खूप चर्चा झाली. आम्हाला आता सरकारसोबत कोणतीही बैठक नको, लेखी स्वरुपात उत्तर हवंय.", अशी भूमिका शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घेतली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात गेल्या तीन तासांपासून अधिक काळ सुरू असलेल्या या बैठकीत केंद्र सरकारकडून कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल, तर शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकरी संघटनांचे एकूण ४० प्रतिनिधी उपस्थित आहेत. 

दरम्यान, केंद्र सरकारसोबतच्या या बैठकीआधीच शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत येत्या ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची घोषणा केलेली आहे. याशिवाय, आज सरकारने कायदे रद्द करण्याची भूमिका घेतली नाही, तर देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळले जातील असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. 

बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटशेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबतची आजची बैठकी होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, गृहमंत्री अमित शहा, रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीनंतर नरेंद्रसिंह तोमर आणि पियूष गोयल हे सरकारच्यावतीनं शेतकरी संघटनांसोबत चर्चा करण्यासाठी विज्ञान भवनात दाखल झाले. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी