शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
3
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
4
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
5
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
6
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
7
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
8
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
9
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
10
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
11
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
13
Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
14
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
15
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
16
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
18
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
19
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
20
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात

कुटुंबीयांच्या संमतीने ठरलं तरी जोडप्याने पळून जाऊन केलं लग्न; कारण समजल्यावर व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 12:13 IST

लग्नाला फक्त एक महिना बाकी असताना एका तरुणाने पळून जाऊन मंदिरात लग्न केलं आहे.

घरच्यांचा विरोध असल्याने अनेकदा मुलगा आणि मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करतात. बिहारमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. कुटुंबीयांच्या संमतीने लग्न ठरलं होतं, लग्नाला फक्त एक महिना बाकी असताना एका तरुणाने पळून जाऊन मंदिरात लग्न केलं आहे. मात्र हे जोडपं एक महिनाही वाट पाहू शकलं नाही आणि त्यांनी मंदिरात जाऊन त्यांच्या कुटुंबियांना न सांगता लग्न केलं. लग्नानंतर जेव्हा ते दोघे घरी पोहोचले तेव्हा कुटुंब आणि गावकरी आश्चर्यचकित झाले. लग्नाला फक्त एक महिना उरला आहे, मग पळून जाऊन लग्न करण्याची काय गरज होती? असा प्रश्न आता सर्वजण विचारत आहेत. 

९ मे रोजी होणार होतं लग्न 

जमुई जिल्ह्यातील सदर ब्लॉकमधील अंबा गावात ही घटना घडली आहे. लग्नाच्या एक महिना आधी दोघे मंदिरात लग्न करून अचानक घरी पोहोचले, लग्न झालेलं पाहून कुटुंबातील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. कुटुंबाने अंबा गावातील रहिवासी दशरथ मंडल यांचा मुलगा अजित कुमारचं लग्न खैरा ब्लॉकमधील सग्धाहा गावातील रहिवासी प्रकाश रावत यांची मुलगी अंजली कुमारीशी ठरलं होतं. ९ मे रोजी लग्न होणार होतं. लग्न ठरल्यानंतर अजित आणि अंजली फोनवर बोलू लागले.

सहन झाला नाही दुरावा

एकमेकांशी फोनवर बोलत असताना त्यांना दुरावा सहन होत नव्हता. अजित गाडी घेऊन अंजलीच्या घरी पोहोचला. त्यानंतर दोघांनीही नवीनगर येथील दुर्गा मंदिरात लग्न केलं. मात्र गुरुवारी रात्री मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी अजितच्या घरी पोहोचून अंजलीला सोबत घेऊन जाण्याचा आग्रह धरला, परंतु अंजली जाण्यास तयार झाली नाही. त्यानंतर शुक्रवारी पाटणेश्वर धाम मंदिरात दोन्ही कुटुंबांच्या सहकार्याने पुन्हा लग्न केलं.

अंजलीच्या कुटुंबाने तिची पाठवणी केली. हे अनोखं लग्न चर्चेचा विषय राहिले. अजित आणि अंजली यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न ठरल्यानंतर दोघंही दिवसभर मोबाईलवर बोलत होते. दोघांनाही वाटलं की, आता ते एक मिनिटही एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी घरातून पळून जाऊन मंदिरात लग्न केलं आहे. 

टॅग्स :marriageलग्नBiharबिहार