शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कुटुंबीयांच्या संमतीने ठरलं तरी जोडप्याने पळून जाऊन केलं लग्न; कारण समजल्यावर व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 12:13 IST

लग्नाला फक्त एक महिना बाकी असताना एका तरुणाने पळून जाऊन मंदिरात लग्न केलं आहे.

घरच्यांचा विरोध असल्याने अनेकदा मुलगा आणि मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करतात. बिहारमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. कुटुंबीयांच्या संमतीने लग्न ठरलं होतं, लग्नाला फक्त एक महिना बाकी असताना एका तरुणाने पळून जाऊन मंदिरात लग्न केलं आहे. मात्र हे जोडपं एक महिनाही वाट पाहू शकलं नाही आणि त्यांनी मंदिरात जाऊन त्यांच्या कुटुंबियांना न सांगता लग्न केलं. लग्नानंतर जेव्हा ते दोघे घरी पोहोचले तेव्हा कुटुंब आणि गावकरी आश्चर्यचकित झाले. लग्नाला फक्त एक महिना उरला आहे, मग पळून जाऊन लग्न करण्याची काय गरज होती? असा प्रश्न आता सर्वजण विचारत आहेत. 

९ मे रोजी होणार होतं लग्न 

जमुई जिल्ह्यातील सदर ब्लॉकमधील अंबा गावात ही घटना घडली आहे. लग्नाच्या एक महिना आधी दोघे मंदिरात लग्न करून अचानक घरी पोहोचले, लग्न झालेलं पाहून कुटुंबातील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. कुटुंबाने अंबा गावातील रहिवासी दशरथ मंडल यांचा मुलगा अजित कुमारचं लग्न खैरा ब्लॉकमधील सग्धाहा गावातील रहिवासी प्रकाश रावत यांची मुलगी अंजली कुमारीशी ठरलं होतं. ९ मे रोजी लग्न होणार होतं. लग्न ठरल्यानंतर अजित आणि अंजली फोनवर बोलू लागले.

सहन झाला नाही दुरावा

एकमेकांशी फोनवर बोलत असताना त्यांना दुरावा सहन होत नव्हता. अजित गाडी घेऊन अंजलीच्या घरी पोहोचला. त्यानंतर दोघांनीही नवीनगर येथील दुर्गा मंदिरात लग्न केलं. मात्र गुरुवारी रात्री मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी अजितच्या घरी पोहोचून अंजलीला सोबत घेऊन जाण्याचा आग्रह धरला, परंतु अंजली जाण्यास तयार झाली नाही. त्यानंतर शुक्रवारी पाटणेश्वर धाम मंदिरात दोन्ही कुटुंबांच्या सहकार्याने पुन्हा लग्न केलं.

अंजलीच्या कुटुंबाने तिची पाठवणी केली. हे अनोखं लग्न चर्चेचा विषय राहिले. अजित आणि अंजली यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न ठरल्यानंतर दोघंही दिवसभर मोबाईलवर बोलत होते. दोघांनाही वाटलं की, आता ते एक मिनिटही एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी घरातून पळून जाऊन मंदिरात लग्न केलं आहे. 

टॅग्स :marriageलग्नBiharबिहार