शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भीती, अंधश्रद्धा झुगारत दिल्लीतील 'त्या' घरात राहायला आले कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 17:43 IST

बुराडी येथील याच घरात 1 जुलै 2011 रोजी एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह आढळले होते.

नवी दिल्ली - सुमारे दीड वर्षापूर्वी दिल्लीतील बुराडी परिसरातील एका घरात एकाच कुटुंबातील 11 जणांनी रहस्यमयरीत्या आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. तेव्हापासून या घराकडे स्थानिक लोक भीतीच्या नजरेने पाहत होते. तसेच या घराबाबत अनेक चर्चाही रंगल्या होत्या. मात्र या घराबाबत वाटणारी भीती आणि अंधश्रद्धांना झुगारत येथे एक कुटुंब वास्तव्यास आले आहे. मोहन कश्यप असे या कुटुंबातील कुटुंबप्रमुखांचे नाव असून, त्यांनी आपण भूतप्रेत, अंधविश्वास मानत नसल्याचे सांगितले. मोहन कश्यप यांनी येथे डायग्नॉस्टिक सेंटर उघडले असून, आज तेथे पूजाविधी करून कामसुद्धा सुरू केले आहे. बुराडीमधील हे घर आणि त्याविषयी पसरलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मोहन कश्यप म्हणाले की, ''मी अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही. जर अशा गोष्टींवर माझा विश्वास असता तर मी येथे आलोच नसतो. मात्र आपल्याकडे कुठल्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी लक्ष्मी-गणेश यांची पूजा करण्याची प्रथा आहे, त्यामुळे मीसुद्धा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पूजा केली.''  

दरम्यान, येथे राहणारे कुटुंब खूप चांगले होते. त्यांच्या घरात कुठलाही वाईट आत्मा राहत नाही. त्यांचा आत्मा थेट स्वर्गात गेला आहे, असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले. बुराडी येथील याच घरात 1 जुलै 2011 रोजी एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह आढळले होते. त्यापैकी 10 जणांचे मृतदेह फाशीला लटकलेले होते. तर एका वृद्धेचा मृतदेह बेडवर पडलेल्या अवस्थेत सापडला होता.  आता या घरात नव्यावे वास्तव्यास आलेले मोहन कश्यप हे घरातील तळमजल्यावर पॅथॉलॉजी लॅब बनवत आहेत. तर त्यांचे कुटुंब पहिल्या मजल्यावर राहणार आहे. दरम्यान, या घराची जबाबदारी सध्या त्या मृत कुटुंबाचे नातेवाईक घेत आहेत.  या घरात 11 कुटुंबीयांच्या झालेल्या रहस्यमयी मृत्यूसोबतच काही रहस्यमय गोष्टीही दिसून आल्या होत्या. त्यात घरातून निघालेल्या 11 पाईपांनी गुढ वाढवले होते. दरम्यान, नव्याने राहण्यास आलेल्या कुटुंबाने 11 पैकी काही पाईप बंद केले आहेत. तर काही उघडे ठेवणे आवश्य असल्याचे मोहन कश्यप यांनी सांगितले.  

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीBurari Deathsबुरारी मृत्यूFamilyपरिवार