शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Falgu River: सीतेच्या शापातून मुक्त होणार फल्गू नदी, पाहा काय होता सीतामाईंचा शाप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 06:25 IST

Falgu River: पितरांच्या पिंडदानासाठी देश-विदेशात चर्चेमध्ये असलेली फल्गू नदी लवकरच सीतामातेच्या शापातून मुक्त होणार आहे. शापामुळे कोरड्या राहणाऱ्या नदीत वर्षभर दोन ते तीन फूट पाणी वाहणार आहे. बिहार सरकार या दिशेने काम करीत आहे.

- विभाष झा पाटणा : पितरांच्या पिंडदानासाठी देश-विदेशात चर्चेमध्ये असलेली फल्गू नदी लवकरच सीतामातेच्या शापातून मुक्त होणार आहे. शापामुळे कोरड्या राहणाऱ्या नदीत वर्षभर दोन ते तीन फूट पाणी वाहणार आहे. बिहार सरकार या दिशेने काम करीत आहे.

कोरड्या फल्गू नदीमध्ये पाणी राहावे, यासाठी रबर डॅमचे निर्माणकार्य वेगाने करण्यात येत आहे. मोकामाहून पाईपलाईनद्वारे गंगा नदीचे पाणी गयेपर्यंत नेण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. रबर डॅम लवकरच तयार होईल, असे सांगितले जात आहे. त्यानंतर गंगा नदीच्या पाण्याने फल्गू नदी खळखळू शकते. यामुळे फल्गू नदीत वर्षभर पाणी राहून येथे पिंडदानासाठी येणाऱ्या भाविकांनाही दिलासा मिळेल.

सध्या फल्गू नदीमध्ये पाणी नसल्यामुळे पिंडदानाला येणाऱ्या भाविकांना नदीच्या वाळूमध्ये दीड ते दोन फूट खोदकाम केल्यावरच पाणी मिळते. लोक येथे खोदकाम करून पाण्याने तर्पण करतात. गयाचे जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन एसएम यांनी सांगितले की, फल्गू नदीवर रबर डॅम उभारण्याचे काम वेगाने केले जात आहे. 

काय होता शाप? पौराणिक कथेनुसार, राजा दशरथाचे पिंडदान फल्गू नदीच्या तीरावर सीता मातेने वटवृक्ष, गाय, तुळस, फल्गू नदी व ब्राह्मण यांना साक्षी मानून केले होते. त्यावेळी भगवान राम व लक्ष्मण पिंडदानाचे साहित्य आणण्यासाठी गेले होते. ते परतल्यावर सीतामातेने त्यांना पिंडदानाबाबत सांगितले. त्यानंतर सीतेने ज्यांना साक्षी मानले होते, त्या सर्वांना बोलावले. परंतु वटवृक्ष सोडून कोणीही खरे सांगितले नाही. यामुळे नाराज झालेल्या सीतामातेने इतरांना शाप दिला व वटवृक्षाला वरदान देऊन सांगितले की, कुणाचेही पिंडदान तुझ्या पूजनाशिवाय पूर्ण होणार नाही.

टॅग्स :riverनदीBiharबिहार