शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ओएनजीसीसाठी दिल्लीतील कृषी भवनात बनावट मुलाखती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 09:30 IST

मुलाखतीसाठी त्या दिवशी एखादा अधिकारी गैरहजर असल्यास त्याचे कार्यालय उपलब्ध करुन द्यायचे

नवी दिल्ली : ओएनजीसीमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने हजारो उमेदवारांना लुटणाऱ्या टोळीची दिल्ली पोलिसांनी भांडाफोड केली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीतील कडोकोट बंदोबस्त असलेल्या कृषी भवनमध्ये या टोळीकडून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. या भामट्यांनी तरुणांकडून करोडो रुपये हडपले असल्याचे समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे मंत्रालयातल्या कर्मचाऱ्याबरोबर मिळून हो गोरखधंदा सुरु होता.

मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांमुळे या टोळीने खरोखरच भरती सुरु असल्याचे भासवण्यासाठी या कार्यालयाचा वापर सुरु केला होता. यासाठी त्यांनी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दोन बहुद्देशिय कर्मचाऱ्यांशी सलगी केली होती. या टोळीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर, ऑनलाईन स्कॉलरशिप संस्थेचा संचालक, ग्राफिक डिझायनर आणि अन्या दोघे असे उच्चशिक्षित लोक होते. मंत्रालयातील दोन्ही कर्मचारी मुलाखतीसाठी त्या दिवशी एखादा अधिकारी गैरहजर असल्यास त्याचे कार्यालय उपलब्ध करुन द्यायचे. यानंतर तरुणांना मुलाखतीसाठी बोलवले जायचे. 

मुलाखत घेताना आरोपी स्वत:ला ओएनजीसीचे समिती सदस्य असल्याचे सांगायचे. मुलाखतीनंतर या तरुणांना बनावट जॉब लेटर दिले जायचे. यानंतर या टोळीचा प्रमुख त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. 

काही दिवसांपूर्वीच या लोकांनी काही तरुणांकडून 22 लाख रुपये उकळले होते. हे तरुण ओएनजीसीकडे विचारण्यास गेले असता हा प्रकार उघड झाला. ओएनजीसीने या प्रकरणी वसंत कुंज पोलीसांत तक्रार दाखल केली. यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. तपासामध्ये असे आढळले की, ओएनजीसीच्या अधिकृत इमेल वरून या तरुणांना मुलाखतीसाठी मेल करण्यात आले होते. तसेच यामध्ये कृषी भवनामध्ये मुलाखत प्रक्रिया होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. 

आरोपींकडून 27 मोबाईल, 2 लॅपटॉप, 10 चेकबूक, 45 सिम कार्ड आणि बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त राजीव रंजन यांनी सांगितले. सर्व आरोपी 25 ते 35 वयोगटातील आहेत. तर मंत्रालयातील एक कर्मचारी पुढील वर्षभरात निवृत्त होणार होता. 

टॅग्स :ONGCओएनजीसीfraudधोकेबाजीdelhiदिल्लीagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकारRural Developmentग्रामीण विकास