शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

फडणवीस, खट्टर, दास हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 05:10 IST

पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी जिंद येथील एका सभेत हरियाणात पुन्हा मनोहर लाल खट्टर सरकार आणण्यासाठी पक्षाला ९० पैकी ७५ जागी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन करून याचे सूतोवाच केले होते.

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांत होणाऱ्या महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये या राज्यांमधील गेल्या पाच वर्षांतील सुशासन हाच भाजपचा प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल व अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, मनोहर लाल खट्टर अणि रघुबीर दास हे विद्यमान मुख्यमंत्रीच पक्षातर्फे नेतृत्वाचे चेहरे म्हणून मतदारांपुढे आणले जातील, असे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी जिंद येथील एका सभेत हरियाणात पुन्हा मनोहर लाल खट्टर सरकार आणण्यासाठी पक्षाला ९० पैकी ७५ जागी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन करून याचे सूतोवाच केले होते.तेच सूत्र कायम ठेवून पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, फडणवीस, खट्टर व दास या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्यांच्या सरकारांची उत्तम कामगिरी हाच पक्षाचा विधानसभा निवडणुकांमधील प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळाल्यावर हेच तीन मुख्यमंत्री त्या पदांवर कायम राहतील हे उघड आहे.हा नेता पुढे म्हणाला की, फडणवीस, खट्टर व दास या तिघांनीही जनतेसमोर आपली स्वच्छ प्रतिमा ठेवली असून, भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजलेल्या या राज्यांना गेली पाच वर्षे कोणत्याही घोटाळ्याविना सुशासन दिले आहे. त्या- त्या राज्यांमधील सरकारांची उत्तम कामगिरी, केंद्रातील स्वपक्षीय मोदी सरकारने घेतलेले अनेक धाडसी निर्णय व विरोधी पक्षांमधील फाटाफूट या सर्वांचा फायदाघेऊन या तिन्ही राज्यांमध्ये पुन्हा सत्तेवर येण्याची भाजपला पक्की खात्री आहे.खास करून महाराष्ट्र व हरियाणात विरोधी पक्षांमधील अनेक नेते भाजपमध्ये सामील झाल्यानेही पक्षाला बळकटी मिळाली आहे.त्यावेळी निकालानंतरच निवडले मुख्यमंत्रीमहाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या तीन राज्यांमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुका भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचेही नाव पुढे न करता लढविल्या होत्या व निकाल जाहीर झाल्यावरच मुख्यमंत्री निवडले गेले होते.विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात २८८ पैकी १२२, हरियाणात ९० पैकी ४७ व झारखंडमध्ये ८१ पैकी ३७ जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा