शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

फडणवीस, खट्टर, दास हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 05:10 IST

पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी जिंद येथील एका सभेत हरियाणात पुन्हा मनोहर लाल खट्टर सरकार आणण्यासाठी पक्षाला ९० पैकी ७५ जागी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन करून याचे सूतोवाच केले होते.

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांत होणाऱ्या महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये या राज्यांमधील गेल्या पाच वर्षांतील सुशासन हाच भाजपचा प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल व अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, मनोहर लाल खट्टर अणि रघुबीर दास हे विद्यमान मुख्यमंत्रीच पक्षातर्फे नेतृत्वाचे चेहरे म्हणून मतदारांपुढे आणले जातील, असे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी जिंद येथील एका सभेत हरियाणात पुन्हा मनोहर लाल खट्टर सरकार आणण्यासाठी पक्षाला ९० पैकी ७५ जागी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन करून याचे सूतोवाच केले होते.तेच सूत्र कायम ठेवून पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, फडणवीस, खट्टर व दास या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्यांच्या सरकारांची उत्तम कामगिरी हाच पक्षाचा विधानसभा निवडणुकांमधील प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळाल्यावर हेच तीन मुख्यमंत्री त्या पदांवर कायम राहतील हे उघड आहे.हा नेता पुढे म्हणाला की, फडणवीस, खट्टर व दास या तिघांनीही जनतेसमोर आपली स्वच्छ प्रतिमा ठेवली असून, भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजलेल्या या राज्यांना गेली पाच वर्षे कोणत्याही घोटाळ्याविना सुशासन दिले आहे. त्या- त्या राज्यांमधील सरकारांची उत्तम कामगिरी, केंद्रातील स्वपक्षीय मोदी सरकारने घेतलेले अनेक धाडसी निर्णय व विरोधी पक्षांमधील फाटाफूट या सर्वांचा फायदाघेऊन या तिन्ही राज्यांमध्ये पुन्हा सत्तेवर येण्याची भाजपला पक्की खात्री आहे.खास करून महाराष्ट्र व हरियाणात विरोधी पक्षांमधील अनेक नेते भाजपमध्ये सामील झाल्यानेही पक्षाला बळकटी मिळाली आहे.त्यावेळी निकालानंतरच निवडले मुख्यमंत्रीमहाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या तीन राज्यांमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुका भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचेही नाव पुढे न करता लढविल्या होत्या व निकाल जाहीर झाल्यावरच मुख्यमंत्री निवडले गेले होते.विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात २८८ पैकी १२२, हरियाणात ९० पैकी ४७ व झारखंडमध्ये ८१ पैकी ३७ जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा