शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पुलवामा हल्ल्याबाबत कर्मचाऱ्याने वादग्रस्त टिप्पणी केल्याने फेसबुकने मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 17:06 IST

समाज माध्यमांमध्ये नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे हक्क अबाधित राखण्यासाठी योग्य तो उपाय योजना केल्या जातील, अशी ग्वाही फेसबुकने दिली आहे. बुधवारी फेसबुक, व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामचे अधिकारी संसदीय कमिटीसमोर हजर झाले

नवी दिल्ली - समाज माध्यमांमध्ये नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे हक्क अबाधित राखण्यासाठी योग्य तो उपाय योजना केल्या जातील, अशी ग्वाही फेसबुकने दिली आहे. बुधवारी फेसबुक, व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामचे अधिकारी संसदीय कमिटीसमोर हजर झाले. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आपली बाजू संसदीय कमिटीसमोर मांडली. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज संसदीय समितीची बैठक झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा, नागरिकांच्या गोपनीय माहितीची सुरक्षा या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.  

संसदीय कमिटीच्या बैठकीदरम्यान फेसबुकच्या कर्मचाऱ्याने पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या टिप्पणीवर फेसबुकने संसदीय कमिटीची माफी मागितली. दहशतवाद आणि पुलवामा हल्ल्याबाबत फेसबुकच्या कर्मचाऱ्याने अभद्र टिप्पणी केली होती. 

 

फेसबुक, व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्राम यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर संसदीय कमिटीचे अध्यक्ष खासदार अनुराग ठाकूर म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर समाजामध्ये द्वेष आणि फूट पाडण्यासाठी होऊ नये. हिंसा भडकवून देशाला ऐक्याला बाधा पोहचेल, अशा कृत्यांना चाप लावण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहेत. या अधिकाऱ्यांनी भारताच्या सुरक्षेला धोका असेल, तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतंही गैरकृत्य होणार नाही, यासाठी योग्य पाऊले उचलू अशी खात्री दिली. 

 

निवडणुकांच्या काळात भारताच्या निवडणूक आयोगाच्या संपर्कात राहून त्यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करू. सोबतच योग्य माहिती आणि गरज भासेल तिथे तात्काळ सुधारणा केल्या जातील, असेही फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

 

टॅग्स :FacebookफेसबुकParliamentसंसद