शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:23 IST

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताबाबत प्रत्यदर्शींनी धक्कादायक अनुभव सांगितला.

Ahmedabad Air India Plane Crash:अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. १२ जून रोजी झालेल्या या भीषण अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाला. विमानातील प्रवासीच नव्हे तर ज्या निवासी भागात हे विमान पडलं तिथसे लोकही मृत्युमुखी पडले. विमानामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन असल्याने स्फोटाची तीव्रता जास्त होती आणि त्यामुळेच आजूबाजूचा परिसर बेचिराख झाला. आता आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींनी त्या घटनेबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर राहणाऱ्या रेखा यांनी विमान कोसळल्यानंतर भूकंप आल्यासारखे वाटलं असं म्हटलं.

अहमदाबादमध्ये झालेल्या एआय १७१ विमान अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी रेखा क्षत्रिय यांनी या भयानक दुर्घटनेनंतरच्या भयानक क्षणांची आठवण सांगितली. आम्हाला विमानाच्या मोठ्या आवाजाची सवय होती मात्र अपघाताच्या आवाजाने आमच्या कानाचे पडदे फुटतील असं वाटत होते, असे रेखा म्हणाल्या. रेखा यांनी यावेळी पायलटचेही आभार मानले. जर विमान थोडे आधीच कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती असं रेखा यांनी म्हटलं.

"ही घटना घडली तेव्हा आम्ही घरातच नेहमीची कामे करत होतो. त्यावेळी मोठा आवाज आला. विमानांचा आवाज ऐकायची आम्हाला सवय आहे. पण त्यावेळी कानाचे पडदे फाटतील असा आवाज येत होता. त्याच्यासोबत संपूर्ण घर देखील हादरत होतं. भूकंप आल्यासारखे वाटत होतं. त्यानंतर बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज झाला. त्यानंतर आम्ही लगेच घरातून बाहेर पळत आलो आणि पाहिलं की विमान कोसळलं आहे. स्फोटानंतर उंचच उंच आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत होते. आग पसरु नये म्हणून सगळे गॅस बंद करुन बाहेर आले. पुढे जाऊन काही लोकांनी पाहिलं तेव्हा कळलं की हे प्रवासी विमान होतं. आम्हाला वाटत होतं की पाकिस्तानातून हल्ला झाला आहे," असं प्रत्यक्षदर्शी रेखा म्हणाल्या.

"आजूबाजूला भीतीचे वातावरण होतं. काही महिला तर विमान पाहून बेशुद्धच पडल्या. त्यांना वाटलं की विमान त्यांच्याच अंगावर पडेल. काहींनी तर ते पाहून रडायला सुरुवात केली. विमानाचे टायर आमच्या छताला स्पर्श करुन झाडाला कापत पुढे गेले. त्यामुळे सर्वजण घाबरले होते. मी पायलटचे आभार मानते, त्याने विमान थोडं पुढे उतरवलं. नाहीतर मृतांची संख्या आणखी वाढली असती," असेही रेखा म्हणाल्या. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडिया