शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वीस वर्षांपासून 'एक्झिट पोल' ठरतायत चुकीचे; उपराष्ट्रपतींचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 13:03 IST

१९९९ पासून अनेक एक्झिट पोल चुकीचे ठरत आले आहेत. मतमोजणीपर्यंत प्रत्येकजण आत्मविश्वासाने बोलत असतो. त्याला काहीही आधार नसतो. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम निकालांसाठी २३ मे पर्यंत वाट पाहण्याचा सल्ला नायडू यांनी दिला.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काही वेळातच विविध वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल दाखविण्यासाठी चढाओढ सुरू झाली होती. अनेक संस्थांनी विद्यमान भाजप सरकारने बहुमताचा आकडा गाठल्याचे म्हटले आहे. मात्र त्याचवेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विजयाच्या आशेमुळे उत्साहित झालेल्या भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचक इशारा दिला आहे.

निवडणुकीनंतर येणारे एक्झिट पोल म्हणजे निवडणुकीचा निकाल नसतो, हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. १९९९ पासून अनेक एक्झिट पोल चुकीचे ठरत आले आहेत. मतमोजणीपर्यंत प्रत्येकजण आत्मविश्वासाने बोलत असतो. त्याला काहीही आधार नसतो. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम निकालांसाठी २३ मे पर्यंत वाट पाहण्याचा सल्ला नायडू यांनी दिला. शुभचिंतकांसोबत आयोजित अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते.

देशाला आणि विविध राज्यांना एका कुशल नेत्याची आणि स्थिर सरकारची आवश्यकता असते, मग तो कोणीही असो. राजकीय पक्षांच्या बदलानुसार समाजात बदल होण्याची गरज, नायडू यांनी यावेळी व्यक्त केली.

१७व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, यावर रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध मतदानोत्तर जनमत चाचण्यांच्या (एक्झिट पोल) अंदाजांमध्ये एकवाक्यता दिसून आली. ‘एक्झिट पोल’चे अंदाज बहुतेक वेळा सपशेल चुकतात, हा पूर्वीचा अनुभव लक्षात घेता, भारतीय मतदारांनी वास्तवात दिलेला कौल काय आहे, हे येत्या गुरुवारी २३ मे रोजी होणाऱ्या मतमाजणीनंतरच स्पष्ट होईल.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूBJPभाजपाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी