शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वीस वर्षांपासून 'एक्झिट पोल' ठरतायत चुकीचे; उपराष्ट्रपतींचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 13:03 IST

१९९९ पासून अनेक एक्झिट पोल चुकीचे ठरत आले आहेत. मतमोजणीपर्यंत प्रत्येकजण आत्मविश्वासाने बोलत असतो. त्याला काहीही आधार नसतो. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम निकालांसाठी २३ मे पर्यंत वाट पाहण्याचा सल्ला नायडू यांनी दिला.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काही वेळातच विविध वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल दाखविण्यासाठी चढाओढ सुरू झाली होती. अनेक संस्थांनी विद्यमान भाजप सरकारने बहुमताचा आकडा गाठल्याचे म्हटले आहे. मात्र त्याचवेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विजयाच्या आशेमुळे उत्साहित झालेल्या भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचक इशारा दिला आहे.

निवडणुकीनंतर येणारे एक्झिट पोल म्हणजे निवडणुकीचा निकाल नसतो, हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. १९९९ पासून अनेक एक्झिट पोल चुकीचे ठरत आले आहेत. मतमोजणीपर्यंत प्रत्येकजण आत्मविश्वासाने बोलत असतो. त्याला काहीही आधार नसतो. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम निकालांसाठी २३ मे पर्यंत वाट पाहण्याचा सल्ला नायडू यांनी दिला. शुभचिंतकांसोबत आयोजित अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते.

देशाला आणि विविध राज्यांना एका कुशल नेत्याची आणि स्थिर सरकारची आवश्यकता असते, मग तो कोणीही असो. राजकीय पक्षांच्या बदलानुसार समाजात बदल होण्याची गरज, नायडू यांनी यावेळी व्यक्त केली.

१७व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, यावर रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध मतदानोत्तर जनमत चाचण्यांच्या (एक्झिट पोल) अंदाजांमध्ये एकवाक्यता दिसून आली. ‘एक्झिट पोल’चे अंदाज बहुतेक वेळा सपशेल चुकतात, हा पूर्वीचा अनुभव लक्षात घेता, भारतीय मतदारांनी वास्तवात दिलेला कौल काय आहे, हे येत्या गुरुवारी २३ मे रोजी होणाऱ्या मतमाजणीनंतरच स्पष्ट होईल.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूBJPभाजपाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी