शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षांपासून 'एक्झिट पोल' ठरतायत चुकीचे; उपराष्ट्रपतींचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 13:03 IST

१९९९ पासून अनेक एक्झिट पोल चुकीचे ठरत आले आहेत. मतमोजणीपर्यंत प्रत्येकजण आत्मविश्वासाने बोलत असतो. त्याला काहीही आधार नसतो. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम निकालांसाठी २३ मे पर्यंत वाट पाहण्याचा सल्ला नायडू यांनी दिला.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काही वेळातच विविध वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल दाखविण्यासाठी चढाओढ सुरू झाली होती. अनेक संस्थांनी विद्यमान भाजप सरकारने बहुमताचा आकडा गाठल्याचे म्हटले आहे. मात्र त्याचवेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विजयाच्या आशेमुळे उत्साहित झालेल्या भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचक इशारा दिला आहे.

निवडणुकीनंतर येणारे एक्झिट पोल म्हणजे निवडणुकीचा निकाल नसतो, हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. १९९९ पासून अनेक एक्झिट पोल चुकीचे ठरत आले आहेत. मतमोजणीपर्यंत प्रत्येकजण आत्मविश्वासाने बोलत असतो. त्याला काहीही आधार नसतो. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम निकालांसाठी २३ मे पर्यंत वाट पाहण्याचा सल्ला नायडू यांनी दिला. शुभचिंतकांसोबत आयोजित अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते.

देशाला आणि विविध राज्यांना एका कुशल नेत्याची आणि स्थिर सरकारची आवश्यकता असते, मग तो कोणीही असो. राजकीय पक्षांच्या बदलानुसार समाजात बदल होण्याची गरज, नायडू यांनी यावेळी व्यक्त केली.

१७व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, यावर रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध मतदानोत्तर जनमत चाचण्यांच्या (एक्झिट पोल) अंदाजांमध्ये एकवाक्यता दिसून आली. ‘एक्झिट पोल’चे अंदाज बहुतेक वेळा सपशेल चुकतात, हा पूर्वीचा अनुभव लक्षात घेता, भारतीय मतदारांनी वास्तवात दिलेला कौल काय आहे, हे येत्या गुरुवारी २३ मे रोजी होणाऱ्या मतमाजणीनंतरच स्पष्ट होईल.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूBJPभाजपाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी