शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Exit Poll: भाजपाला बहुमताची हुलकावणी; हरयाणा विधानसभेत 'जेजेपी' ठरणार 'किंगमेकर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 19:50 IST

भाजपा, काँग्रेसमध्ये सत्तेसाठी जोरदार चुरस

चंदिगढ: महाराष्ट्रासोबत हरयाणातही विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. महाराष्ट्रात महायुतीला मोठा जनादेश मिळताना दिसत असला तरी हरयाणात भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियानं केलेल्या सर्वेक्षणातून भाजपा आणि काँग्रेसमध्ये कडवी लढत दिसत आहे. त्यामुळे हरयाणात सत्ता स्थापनेसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळू शकते. हरयाणात विधानसभेचे 90 मतदारसंघ आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी 46 जागांची आवश्यकता असते. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपाला 32 ते 44, तर काँग्रेसला 30 ते 42 जागा मिळू शकतात. काल मतदान झाल्यानंतर जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी भाजपाला प्रचंड बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला हरयाणात केवळ 15 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाला 47 जागांवर यश मिळालं होतं.हरयाणात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल सांगतो. राज्यात काँग्रेस, भाजपामध्ये सत्तेसाठी जोरदार चुरस असताना दुश्यंत चौटाला यांच्या जेजेपीला 6 ते 10 मिळू शकतात. इतर पक्षांनादेखील 6 ते 10 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाचा अंदाज खरा ठरल्यास 24 ऑक्टोबरला मतमोजणी झाल्यावर हरयाणात मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळू शकतो. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 47 जागा मिळाल्या होत्या. यानंतर 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं राज्यातील सर्वच्या सर्व 10 जागा जिंकल्या. यावेळी राज्यातील 79 विधानसभा मतदारसंघात भाजपानं आघाडी मिळवली. मात्र आता हे चित्र बदलताना दिसत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 15 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ 10 विधानसभा मतदारसंघात आघाडी राखता आली.  

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस