शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

'सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व धोक्यात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 12:12 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबद्दल न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्र लिहिलं आहे. कॉलेजियमच्या शिफारसीनंतरही न्यायाधीशांच्या नियुक्तीला उशीर होत असल्याबद्दल जोसेफ यांनी चिंता व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व धोक्यात असल्याचं जोसेफ यांनी मिश्रा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 'कॉलेजियमच्या शिफारसीनंतरही न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना उशीर होत आहे. या समस्येवर मार्ग काढण्याची आवश्यकता आहे,' असं न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीत होत असल्याबद्दल विलंबाबद्दल जोसेफ यांनी चिंता व्यक्त केली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 'सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात कोणतंही पाऊल न उचलल्यास इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही,' असं जोसेफ यांनी पत्रात म्हटलं आहे.वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा आणि उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस कॉलेजियमनं फेब्रुवारीत केली होती. मात्र या शिफारसींचं अद्याप काहीही झालेलं नाही. त्यामुळेच न्यायाधीश जोसेफ यांनी अतिशय कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. 'कॉलेजियमच्या शिफारसीला तीन महिने होऊन गेलेत. मात्र अद्याप न्यायाधीशांची नियुक्ती झालेली नाही. इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे,' असं जोसेफ यांनी पत्रात म्हटलं आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBJPभाजपा