शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
3
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
4
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
5
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
6
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
7
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
8
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
9
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
10
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
11
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
12
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
13
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
14
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
15
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
16
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
17
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
18
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
19
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
20
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं

हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 21:50 IST

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. जवळपास तीन ते चार दिवस चाललेल्या या संघर्षादरम्यान, भारताच्या सैन्यदलांचं श्रेष्ठत्व अधोरेखित झालं होतं. आता भारतीय सैन्यदलांनी केलेल्या या दैदिप्यमान कारवाईमागील एकेक पैलू समोर येत आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यदलाला त्यांच्या हवाई तळांवर हल्ला चढवत अद्दल घडवली होती. जवळपास तीन ते चार दिवस चाललेल्या या संघर्षादरम्यान, भारताच्या सैन्यदलांचं श्रेष्ठत्व अधोरेखित झालं होतं. आता भारतीय सैन्यदलांनी केलेल्या या दैदिप्यमान कारवाईमागील एकेक पैलू समोर येत आहे. त्यात हळदी घाटीमध्ये केलेला सराव, सीडीएस यांनी आखलेली रणनीती आणि तिन्ही दलांमधील उत्तम समन्वय यामुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरले.

भारतील लष्कर आणि नौदलाने १८ ते २२ एप्रिलदरम्यान हल्दीघाटीमध्ये एक सराव केला होता. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सरावाचा उद्देश हा लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये तात्काळ आणि स्पष्टपणे संवाद व्हावा हा होता. याचदरम्यान, पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी परिस्थितीचं गांभीर्य समजून तिन्ही सैन्यदलांमध्ये आवश्यक व्यवस्था त्वरित प्रभावाने सक्रिय केली गेली पाहिजे हे समजून घेतले. त्याबरोबरच एअर डिफेन्स सिस्टिमही सीमावर्ती भागात तैनात करण्यात आली.

तिन्ही सैन्यदलांच्या कमांड कंट्रोल आणि रडार सिस्टिमला जोडून पाकिस्तानच्या सीमेवर पसरलेल्या संपूर्ण युद्धक्षेत्राचं चित्र एकाच ठिकाणाहून स्पष्टपणे दिसेल, एक असं नेटवर्क तयार करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं तेव्हा या सिस्टिमच्या मदतीने लष्कराकडून उमटणारी प्रतिक्रिया स्पष्टपणे दिसून आली. तसेच त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आलं. सूत्रांनी सांगितले की, तिन्ही सैन्यांचे रडारही संरक्षण दलांच्या मुख्यालयांपर्यंत स्पष्ट फोटो पाठवत होते.तसेच त्यांना त्यानुसार निर्णय घेण्यास सक्षम बनवण्यात येत होते. दरम्यान, जमिनीवर तैनात तुकड्यांना भविष्यातील युद्धाच्या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यामुळे ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यात यश मिळालं.  सीडीएस जनरल चौहान हे दीर्घकाळापासून तिनी सैन्यदलांमध्ये ऐक्याला प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या या रणनीतीने भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षामध्ये उत्तम परिणाम समोर आणले होते. तिन्ही सैन्यदलांची ताकद, शस्त्र सामुग्री आणि विचारशक्ती एक झाली, त्यामुळेच ऑपरेशन सिंदूरसारखी कारवाई तत्काळ आणि प्रभावीपणे पूर्ण होऊ शकली.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदल