शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
3
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
4
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
5
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
6
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
7
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
8
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
9
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
10
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
11
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
12
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
13
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
14
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
15
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
16
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
17
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
18
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
19
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
20
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 21:50 IST

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. जवळपास तीन ते चार दिवस चाललेल्या या संघर्षादरम्यान, भारताच्या सैन्यदलांचं श्रेष्ठत्व अधोरेखित झालं होतं. आता भारतीय सैन्यदलांनी केलेल्या या दैदिप्यमान कारवाईमागील एकेक पैलू समोर येत आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यदलाला त्यांच्या हवाई तळांवर हल्ला चढवत अद्दल घडवली होती. जवळपास तीन ते चार दिवस चाललेल्या या संघर्षादरम्यान, भारताच्या सैन्यदलांचं श्रेष्ठत्व अधोरेखित झालं होतं. आता भारतीय सैन्यदलांनी केलेल्या या दैदिप्यमान कारवाईमागील एकेक पैलू समोर येत आहे. त्यात हळदी घाटीमध्ये केलेला सराव, सीडीएस यांनी आखलेली रणनीती आणि तिन्ही दलांमधील उत्तम समन्वय यामुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरले.

भारतील लष्कर आणि नौदलाने १८ ते २२ एप्रिलदरम्यान हल्दीघाटीमध्ये एक सराव केला होता. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सरावाचा उद्देश हा लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये तात्काळ आणि स्पष्टपणे संवाद व्हावा हा होता. याचदरम्यान, पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी परिस्थितीचं गांभीर्य समजून तिन्ही सैन्यदलांमध्ये आवश्यक व्यवस्था त्वरित प्रभावाने सक्रिय केली गेली पाहिजे हे समजून घेतले. त्याबरोबरच एअर डिफेन्स सिस्टिमही सीमावर्ती भागात तैनात करण्यात आली.

तिन्ही सैन्यदलांच्या कमांड कंट्रोल आणि रडार सिस्टिमला जोडून पाकिस्तानच्या सीमेवर पसरलेल्या संपूर्ण युद्धक्षेत्राचं चित्र एकाच ठिकाणाहून स्पष्टपणे दिसेल, एक असं नेटवर्क तयार करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं तेव्हा या सिस्टिमच्या मदतीने लष्कराकडून उमटणारी प्रतिक्रिया स्पष्टपणे दिसून आली. तसेच त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आलं. सूत्रांनी सांगितले की, तिन्ही सैन्यांचे रडारही संरक्षण दलांच्या मुख्यालयांपर्यंत स्पष्ट फोटो पाठवत होते.तसेच त्यांना त्यानुसार निर्णय घेण्यास सक्षम बनवण्यात येत होते. दरम्यान, जमिनीवर तैनात तुकड्यांना भविष्यातील युद्धाच्या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यामुळे ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यात यश मिळालं.  सीडीएस जनरल चौहान हे दीर्घकाळापासून तिनी सैन्यदलांमध्ये ऐक्याला प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या या रणनीतीने भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षामध्ये उत्तम परिणाम समोर आणले होते. तिन्ही सैन्यदलांची ताकद, शस्त्र सामुग्री आणि विचारशक्ती एक झाली, त्यामुळेच ऑपरेशन सिंदूरसारखी कारवाई तत्काळ आणि प्रभावीपणे पूर्ण होऊ शकली.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदल