शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 21:50 IST

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. जवळपास तीन ते चार दिवस चाललेल्या या संघर्षादरम्यान, भारताच्या सैन्यदलांचं श्रेष्ठत्व अधोरेखित झालं होतं. आता भारतीय सैन्यदलांनी केलेल्या या दैदिप्यमान कारवाईमागील एकेक पैलू समोर येत आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यदलाला त्यांच्या हवाई तळांवर हल्ला चढवत अद्दल घडवली होती. जवळपास तीन ते चार दिवस चाललेल्या या संघर्षादरम्यान, भारताच्या सैन्यदलांचं श्रेष्ठत्व अधोरेखित झालं होतं. आता भारतीय सैन्यदलांनी केलेल्या या दैदिप्यमान कारवाईमागील एकेक पैलू समोर येत आहे. त्यात हळदी घाटीमध्ये केलेला सराव, सीडीएस यांनी आखलेली रणनीती आणि तिन्ही दलांमधील उत्तम समन्वय यामुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरले.

भारतील लष्कर आणि नौदलाने १८ ते २२ एप्रिलदरम्यान हल्दीघाटीमध्ये एक सराव केला होता. संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सरावाचा उद्देश हा लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये तात्काळ आणि स्पष्टपणे संवाद व्हावा हा होता. याचदरम्यान, पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी परिस्थितीचं गांभीर्य समजून तिन्ही सैन्यदलांमध्ये आवश्यक व्यवस्था त्वरित प्रभावाने सक्रिय केली गेली पाहिजे हे समजून घेतले. त्याबरोबरच एअर डिफेन्स सिस्टिमही सीमावर्ती भागात तैनात करण्यात आली.

तिन्ही सैन्यदलांच्या कमांड कंट्रोल आणि रडार सिस्टिमला जोडून पाकिस्तानच्या सीमेवर पसरलेल्या संपूर्ण युद्धक्षेत्राचं चित्र एकाच ठिकाणाहून स्पष्टपणे दिसेल, एक असं नेटवर्क तयार करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं तेव्हा या सिस्टिमच्या मदतीने लष्कराकडून उमटणारी प्रतिक्रिया स्पष्टपणे दिसून आली. तसेच त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आलं. सूत्रांनी सांगितले की, तिन्ही सैन्यांचे रडारही संरक्षण दलांच्या मुख्यालयांपर्यंत स्पष्ट फोटो पाठवत होते.तसेच त्यांना त्यानुसार निर्णय घेण्यास सक्षम बनवण्यात येत होते. दरम्यान, जमिनीवर तैनात तुकड्यांना भविष्यातील युद्धाच्या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यामुळे ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यात यश मिळालं.  सीडीएस जनरल चौहान हे दीर्घकाळापासून तिनी सैन्यदलांमध्ये ऐक्याला प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या या रणनीतीने भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षामध्ये उत्तम परिणाम समोर आणले होते. तिन्ही सैन्यदलांची ताकद, शस्त्र सामुग्री आणि विचारशक्ती एक झाली, त्यामुळेच ऑपरेशन सिंदूरसारखी कारवाई तत्काळ आणि प्रभावीपणे पूर्ण होऊ शकली.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदल