शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध झाल्यास भारतीय फायटर जेट चीनवर करतील मात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 18:52 IST

जर हवाई युद्ध झालंच, तर भारताकडून चीनचा पराभव निश्चित आहे.

नवी दिल्ली, दि. 9 - गेल्या काही दिवसांपासून भारत-चीनदरम्यान वाद उफाळून आला असून, चीन वारंवार भारताला युद्धाच्या धमक्या देत आहे. तसेच एखाद्या वेळेस डोंगर हलवणं शक्य आहे, मात्र चीनच्या लष्करावर कोणीही मात करू शकत नाही, असंही चीननं म्हटलं होतं. मात्र जर हवाई युद्ध झालंच, तर भारताकडून चीनचा पराभव निश्चित आहे.भारताच्या लढाऊ विमानांसमोर चीनची विमानं तग धरू शकत नाहीत. भारताचं मिराज-2000 हे लढाऊ विमान हाताळणारे स्क्वाड्रन लीडर समीर जोशी यांनी ही माहिती दिली आहे. भारत व चीन या दोन्ही देशांतील हवाई दलाच्या सामर्थ्याचा अभ्यास करून समीर जोशींनी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात त्यांनी भारत आणि चीनच्या कमकुवत आणि मजबूत बाजू सविस्तरपणे नमूद केल्या आहेत. द ड्रॅगन क्लॉज: असेसिंग चायना पीएलएएएफ (The Dragon’s Claws: Assessing China’s PLAAF Today) या अहवालात दोन्ही देशांमधील हवाई दलाच्या सामर्थ्याची माहिती देण्यात आली आहे. भारत-चीनमध्ये तिबेट आणि आसपासच्या भागात युद्ध झाल्यास भारतीय हवाई दल चीनवर नक्कीच मात करेल, असं या अहवालात म्हटलं आहे.चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सची (पीएलएएएफ) अनेक विमानतळं तिबेटच्या पठाराच्या खूप खाली आहेत. त्यामुळे उड्डाण करत तिबेटच्या पठारावर येण्यासाठी विमानाला भरपूर मोठं उड्डाण करावं लागणार आहे. विमान तिबेटच्या पठारावर येईपर्यंत विमानाचे बरंच इंधन कमी होईल. त्यामुळे साहजिकच विमानाच्या इंजिनावर मोठा ताण पडेल. या सर्व प्रकारामुळे विमानाच्या वेगावरही मर्यादा येतील आणि लढाऊ विमानांचा वेग मंदावेल, असंही समीर जोशी म्हणाले आहेत. मात्र या बाबतीत भारत चीनपेक्षा उजवा आहे. भारताची तेजपुर, कलाईकुंडा, छाबुआ आणि हाशीमारा ही विमानतळं येथे आहेत. तिबेटच्या पठाराची उंची आणि भारताची विमानतळं असलेल्या जागांची उंची यात मोठं अंतर नाही. त्यामुळे भारताची विमानं तिबेटच्या आकाशात चिनी विमानांच्या तुलनेत कमी इंधन वापरून उंचीवरून हल्ला करण्यास सक्षम आहेत, असे समीर जोशी म्हणाले आहेत.