शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

केंद्राकडून अतिरिक्त जमिनींची होणार विक्री; रेल्वे, संरक्षण मंत्रालयाकडे २९.७५ लाख एकर जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 06:56 IST

या अतिरिक्त जमिनींवर नव्या पायाभूत सुविधा उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या मंत्रालयांच्या अतिरिक्त जमिनींवर उभारल्या जाणाऱ्या व्यावसायिक विकास आणि पायाभूत सुविधा यासंबंधीच्या योजनेला मंजुरीही देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : महत्त्वाच्या मंत्रालय आणि विभागांच्या रिकाम्या असलेल्या अतिरिक्त जमिनींचा वापर आता केंद्र सरकार पैसा उभारण्यासाठी करणार आहे. यात रेल्वे, दूरसंचार आणि संरक्षण मंत्रालयांच्या अखत्यारित असलेल्या जमिनींचा समावेश असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

या अतिरिक्त जमिनींवर नव्या पायाभूत सुविधा उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या मंत्रालयांच्या अतिरिक्त जमिनींवर उभारल्या जाणाऱ्या व्यावसायिक विकास आणि पायाभूत सुविधा यासंबंधीच्या योजनेला मंजुरीही देण्यात आली आहे.

केंद्राने या योजनेला मान्यता दिल्यानंतर रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयाने आपापल्या ताब्यात असलेल्या अतिरिक्त जमिनींच्या व्यावसायिक वापरासाठीची योजना आखायलाही सुरुवात केली आहे. पायाभूत सुविधांच्या उभारण्याच्या या योजनेचा सर्वाधिक लाभ बीएसएनएल या सरकारी कंपनीला मिळू शकतो. बीएसएनएलने आपल्या ताब्यातील किमान एक डझनभर रिकाम्या अतिरिक्त जमिनींची निश्चिती केली आहे. या जमिनींवर कामे लवकरच सुरू केली जाणार आहेत.

रेल्वे मंत्रालयानेही आपल्याकडील अतिरिक्त जमिनींचा व्यावसायिक लाभ मिळवण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि राज्य सरकार किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग आहे.

कुणाच्या ताब्यात किती जमीन?च्रेल्वे व संरक्षण मंत्रालयाकडे सर्वात जास्त सरकारी जमीन आहे. रेल्वेकडे सध्या ४.७८ लाख हेक्टर (११.८० लाख एकर) जमीन आहे. त्यापैकी ४.२७ लाख हेक्टर जमीन रेल्वे आणि इतर सहयोगी संस्थांच्या वापरात आहे, तर ०.५१ लाख हेक्टर (१.२५ लाख एकर) जमीन तशीच पडून आहे. संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात असलेली १७.९५ लाख एकर जमीन तशीच वापराविना आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर संरक्षण मंत्रालयाने आपल्या रिकाम्या जमिनींचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीrailwayरेल्वे