शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

माजी नोकरशहांनी लिहिलं राष्ट्रपतींना पत्र, निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर व्यक्त केली चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 11:51 IST

देशात निपक्ष:पाती चौकशी आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाची भूमिका यावर चिंता व्यक्त करणारे 66 माजी नोकरशहांनी लिहिलेलं पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवलं आहे. 

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीला घेऊन राजकीय पक्षांच्या प्रचाराला रंगत आली आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच निवडणूक आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारीही एकमेकांच्याविरोधात देत आहेत. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी येत निवडणूक आयोगाकडे येत असताना त्या तक्रारींची निपक्ष:पाती चौकशी व्हावी ही मोठी जबाबदारी निवडणूक आयोगाला पार पाडावी लागणार आहे. मात्र देशात निपक्ष:पाती चौकशी आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाची भूमिका यावर चिंता व्यक्त करणारे 66 माजी नोकरशहांनी लिहिलेलं पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवलं आहे. 

66 माजी नोकरशहा वर्गाने देशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे. मात्र आचारसंहितेचे पालन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. या नोकरशहांनी लिहलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की, ऑपरेशन शक्ती दरम्यान अॅन्टी सॅटेलाईट मिसाइलचं यशस्वी परीक्षणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना भाषण केले. नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी बायोपिक आला. मोदी यांच्या योजनांची माहिती देणाऱ्या वेबसिरीज आणि मालिका आल्या. भाजपाच्या अनेक नेत्यांची वादग्रस्त विधाने ज्यावर निवडणूक आयोगाकडे अनेक आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आल्या मात्र त्यावर निवडणूक आयोगाकडून दिखाव्यापुरती कारवाई करण्यात येतेय असं या पत्रात नमूद केलं आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहणाऱ्यांमध्ये माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन, दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग, पंजाबचे माजी डीजीपी जुलिरो रिबेरो, प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार आणि ट्रायचे माजी चेअरमन राजीव खुल्लर यांच्यासारख्या माजी नोकरशहांचा समावेश आहे. सत्ताधारी पक्ष आणि केंद्र सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग आणि मनमानी पद्धतीने आचारसंहितेचं उल्लंघन करण्याचं काम होत आहे. त्यांच्या अशा कारभारामुळे निवडणूक आयोगाची कोणत्याही प्रकारची भिती त्यांच्या मनात नाही असा आरोप पत्रात केला आहे. पीएम नरेंद्र मोदी यांचा बायोपिक, चहाच्या कपवर मै भी चौकीदार असा उल्लेख तर मालिकांमधून मोदींच्या योजनेचा प्रचार या माध्यमातून होणाऱ्या आचारसंहितेचं उल्लंघन थांबविण्याची मागणी माजी नोकरशहांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून केली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPresidentराष्ट्राध्यक्षIndiaभारतElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग