शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम ‘चोर’ मशीन आहे - फारूक अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 18:01 IST

निवडणुकांमध्ये पारदर्शकता असावी,या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड होऊ नये, यासाठी पुन्हा मतपत्रिका प्रणाली लागू व्हावी, असे वक्तव्य जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी शनिवारी केली.

ठळक मुद्देईव्हीएम चोर मशिन - फारूक अब्दुल्लाजम्मू काश्मीरच्या परिस्थितीसाठी भाजपा जबाबदार - फारूक अब्दुल्ला

कोलकाता - निवडणुकांमध्ये पारदर्शकता असावी तसंच या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड होऊ नये, यासाठी पुन्हा मतपत्रिका प्रणाली लागू व्हावी, अशी मागणी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी शनिवारी केली. शिवाय, त्यांनी ईव्हीएमचा चोर मशिन असादेखील उल्लेख केला. भाजपाला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांचे शक्तिप्रदर्शन करण्याच्या हेतूने तृणमूल काँग्रेसने आज कोलकाता येथील बिग्रेड मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले आहे.    

या मेळाव्याला संबोधित करताना फारूक अब्दुल्ला यांनी भाजपावर चौफेर टीका केली. ते म्हणाले की, ''एका व्यक्तीला (पंतप्रधान नरेंद्र मोदी )सत्तेतून हटवणे हा प्रमुख मुद्दा नाहीय. देशाचे रक्षण करणे आणि देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा सन्मान करण्याचा मुख्य उद्देश आहे. 

पुढे त्यांनी असंही म्हटले की, ईव्हीएम, चोर मशिन आहे. या मशिनच्या वापरावर बंदी आणली पाहिजे. ईव्हीएमचा वापर थांबवण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी निवडणुकांदरम्यान मतपत्रिका प्रणाली पुन्हा सुरू करण्यासाठी विरोधकांनी निवडणूक आयोग आणि राष्ट्रपतींची भेट घ्यायला हवी. 

जम्मू काश्मीरमधील परिस्थितीसाठीही त्यांनी भाजपाला जबाबदार ठरवले आहे. ते म्हणाले की, 'मी मुस्लीम आहे, पण मी देखील भारताचा एक भाग आहे. जम्मू- काश्मीरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भारतासोबत राहायचे आहे'. 

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाNarendra Modiनरेंद्र मोदी