शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

EVM ला बाय बाय, पुढच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे? राम माधव यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 13:52 IST

मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या इव्हीएमच्या विश्वसनियतेवर वर विविध राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांकडून वारंवार शंका उपस्थित करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडूनही इव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यासाठी सहमती दर्शवण्यात येत आहे.

नवी दिल्ली -  मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या इव्हीएमच्या विश्वसनियतेवर वर विविध राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांकडून वारंवार शंका उपस्थित करण्यात येत आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही वेळोवेळी इव्हीएमविरोधी सूर आळवला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडूनही इव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यासाठी सहमती दर्शवण्यात येत आहे. जर सर्वपक्षांचे एकमत झाले तर भविष्यात इव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरने मतदान घेण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे मत भाजपाकडून मांडण्यात आले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या 84 व्या महाअधिवेशनात मतपत्रिकेद्वार मतदान घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे महासचिव राम माधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही माहिती दिली. माधव म्हणाले, मतपत्रिकेऐवजी इव्हीएमने मतदान घेण्याचा निर्णय व्यापक स्तरावर सहमती झाल्यावर घेण्यात आला होता. आता आज जर प्रत्येक पक्षाने पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास सहमती देण्याबाबत विचार सुरू केला तर आम्हीसुद्धा याबाबत विचार करू शकतो.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुका आटोपल्यानंतर अनेक पक्षांनी ईव्हीएममध्ये फेरफार असल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर गुजरात विधानसभा निवडणुकीमधील भाजपाच्या विजयानंतर हार्दिक पटेलसह विविध नेत्यांनी इव्हीएम हेच भाजपाच्या विजयाचे कारण असल्याचे सांगितले होते.  

टॅग्स :ElectionनिवडणूकIndiaभारतBJPभाजपा