शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

चार वर्षांत प्रत्येकाला स्वत:चे घर; लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:57 IST

येत्या चार वर्षांत देशातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्याचे आश्वासन देतानाच १० कोटी कुटुंबांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली  - येत्या चार वर्षांत देशातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्याचे आश्वासन देतानाच १० कोटी कुटुंबांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली.७२व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, कोट्यवधी तरुणांना रोजगार, प्रत्येक गावात पिण्याचे पाणी, प्रत्येक घरात वीजपुरवठा अशा स्वप्नांची मालिकाच उभी केली आणि देशाचा विकास वेगाने करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत माझ्या नेतृत्वाखालील सरकार हाच एकमात्र पर्याय देशापुढे असल्याचे सांगत एक प्रकारे निवडणुकांच्या तयारीचे बिगुल फुंकले.‘हम मख्खनपर नहीं पत्थरपर लकीर खिंचनेवाले लोग है’ असे आत्मविश्वासाने सांगताना निद्रिस्त अवस्थेतील भारताला चार वर्षांत आम्ही जागेच केले नाही, तर त्याचे वेगवान मार्गक्रमणही सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला. भारताची जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सांगत वस्तू व सेवा कराने (जीएसटी) भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी गती दिली. मुद्रा बँक योजनेमुळे १३ कोटी तरुणांना कर्जपुरवठा झाला. चार कोटी तरुणांनी आयुष्यात प्रथमच कर्ज घेतले. स्वच्छ भारत अभियानामुळे लक्षावधी बालके अनारोग्यापासून वाचली, असे मोदी म्हणाले.अवकाशात फडकविणार तिरंगाअंतराळ क्षेत्रात वैज्ञानिकांनी प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत केली असून २0२२ साली भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७५व्या वर्धापन दिनी अवकाशवीर तिरंगा हातात घेऊन अंतराळात जाईल आणि अंतराळाला गवसणी घालणारा भारत जगातील चौथा देश बनेल.सैन्यात महिलांना बरोबरीचे स्थानसर्जिकल स्ट्राईकद्वारे शत्रूंना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून दिली आहे. महिलांनाही लवकरच सशस्त्र दलांमध्ये बरोबरीचे स्थान दिले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही पंतप्रधानांनी केली.मोदींना राफेलवर खुल्या चर्चेचे आव्हाननवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण पोकळ असल्याचे सांगत काँग्रेसने मोदींना राफेल सौद्यासह अन्य मुद्द्यांवर खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. - सविस्तर वृत्त/९सरकारविषयी देशात चार वर्षांपूर्वी असलेली नकारात्मक भावना बदलून टाकण्यात आम्ही यशस्वी झालो, असे नमूद करीत पंतप्रधान म्हणाले, देशात भ्रष्टाचारी, मध्यस्थ अन् दलाल नष्ट झाले आहेत. ईशान्य भारतातील गावांत पहिल्यांदा वीज पोहोचली, तेव्हा सारे गाव आनंदाने नाचले. भारताच्या या दुर्लक्षित भागात विकासाच्या अनेक योजना सुरू आहेत. दिल्ली या राज्यांच्या दारात उभी करण्यात माझे सरकार यशस्वी ठरले.आपल्या ८२ मिनिटांच्या प्रदीर्घ भाषणात मोदींनी शेतकरी, ओबीसी, दलित, नव्या पिढीतील तरुण, महिला, तीन तलाक, काश्मीर, दक्षिण भारत, सैन्यदल, न्यायालये, शिक्षण, इंटरनेट, अर्थकारण, अंतराळातील झेप असे विविध विषय आणि त्यांच्याशी निगडित भविष्यातील योजनांचा उल्लेख केला. ‘जिद है एक सूर्य उगाना है, अंबरसे उंचा जाना है’ अशा काव्यपंक्ती सादर करीत मजबूत भारताचे चित्रच सादर केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnewsबातम्याIndependence Dayस्वातंत्र्य दिवस