शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

चार वर्षांत प्रत्येकाला स्वत:चे घर; लाल किल्ल्यावरून मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:57 IST

येत्या चार वर्षांत देशातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्याचे आश्वासन देतानाच १० कोटी कुटुंबांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली  - येत्या चार वर्षांत देशातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्याचे आश्वासन देतानाच १० कोटी कुटुंबांसाठी ‘आयुष्यमान भारत’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केली.७२व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, कोट्यवधी तरुणांना रोजगार, प्रत्येक गावात पिण्याचे पाणी, प्रत्येक घरात वीजपुरवठा अशा स्वप्नांची मालिकाच उभी केली आणि देशाचा विकास वेगाने करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत माझ्या नेतृत्वाखालील सरकार हाच एकमात्र पर्याय देशापुढे असल्याचे सांगत एक प्रकारे निवडणुकांच्या तयारीचे बिगुल फुंकले.‘हम मख्खनपर नहीं पत्थरपर लकीर खिंचनेवाले लोग है’ असे आत्मविश्वासाने सांगताना निद्रिस्त अवस्थेतील भारताला चार वर्षांत आम्ही जागेच केले नाही, तर त्याचे वेगवान मार्गक्रमणही सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला. भारताची जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सांगत वस्तू व सेवा कराने (जीएसटी) भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी गती दिली. मुद्रा बँक योजनेमुळे १३ कोटी तरुणांना कर्जपुरवठा झाला. चार कोटी तरुणांनी आयुष्यात प्रथमच कर्ज घेतले. स्वच्छ भारत अभियानामुळे लक्षावधी बालके अनारोग्यापासून वाचली, असे मोदी म्हणाले.अवकाशात फडकविणार तिरंगाअंतराळ क्षेत्रात वैज्ञानिकांनी प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत केली असून २0२२ साली भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७५व्या वर्धापन दिनी अवकाशवीर तिरंगा हातात घेऊन अंतराळात जाईल आणि अंतराळाला गवसणी घालणारा भारत जगातील चौथा देश बनेल.सैन्यात महिलांना बरोबरीचे स्थानसर्जिकल स्ट्राईकद्वारे शत्रूंना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून दिली आहे. महिलांनाही लवकरच सशस्त्र दलांमध्ये बरोबरीचे स्थान दिले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही पंतप्रधानांनी केली.मोदींना राफेलवर खुल्या चर्चेचे आव्हाननवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण पोकळ असल्याचे सांगत काँग्रेसने मोदींना राफेल सौद्यासह अन्य मुद्द्यांवर खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. - सविस्तर वृत्त/९सरकारविषयी देशात चार वर्षांपूर्वी असलेली नकारात्मक भावना बदलून टाकण्यात आम्ही यशस्वी झालो, असे नमूद करीत पंतप्रधान म्हणाले, देशात भ्रष्टाचारी, मध्यस्थ अन् दलाल नष्ट झाले आहेत. ईशान्य भारतातील गावांत पहिल्यांदा वीज पोहोचली, तेव्हा सारे गाव आनंदाने नाचले. भारताच्या या दुर्लक्षित भागात विकासाच्या अनेक योजना सुरू आहेत. दिल्ली या राज्यांच्या दारात उभी करण्यात माझे सरकार यशस्वी ठरले.आपल्या ८२ मिनिटांच्या प्रदीर्घ भाषणात मोदींनी शेतकरी, ओबीसी, दलित, नव्या पिढीतील तरुण, महिला, तीन तलाक, काश्मीर, दक्षिण भारत, सैन्यदल, न्यायालये, शिक्षण, इंटरनेट, अर्थकारण, अंतराळातील झेप असे विविध विषय आणि त्यांच्याशी निगडित भविष्यातील योजनांचा उल्लेख केला. ‘जिद है एक सूर्य उगाना है, अंबरसे उंचा जाना है’ अशा काव्यपंक्ती सादर करीत मजबूत भारताचे चित्रच सादर केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnewsबातम्याIndependence Dayस्वातंत्र्य दिवस