शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

दर दोन दिवसांमागे एका दहशतवाद्याला ठार केले; लोकसभेत मांडला लेखाजोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 13:58 IST

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून दहशतवादी हल्ले वाढले होते.

नवी दिल्ली : सर्जिकल आणि एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडलेले असताना मोदी सरकारच्या काळात किती दहशतवादी मारले गेले याचा आकडाच गृहमंत्रालयाने लोकसभेत दिला आहे. जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीच्या घटनांमध्ये 2018 पेक्षा 43 टक्क्यांनी कमी आली आहे. यानुसार 2014 पासून 963 दहशतवादी मारले गेले आहेत. 

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून दहशतवादी हल्ले वाढले होते. पठाणकोट, पुलवामा हल्ले हे या काळातील मोठे हल्ले होते. यानंतर मोदी सरकारने ऑपरेशन ऑलआऊट सुरू करत काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली होती. यामध्ये अनेक संघटनांचे भारतातील म्होरके मारले गेले आहेत. दर दोन दिवसाला एक दहशतवादी मारला गेला असून दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्यूत्तर देताना 413 जवान शहीद झाले आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे. 

चांगली सेवा हवी असेल तर पैसे मोजारस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्रालयांच्या अनुदानावर झालेल्या चर्चेवेळी मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी जर तुम्हाला चांगली सेवा हवी असल्यास पैसे मोजावेच लागतील. रस्ते अपघात कमी करण्यासाठी इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, वाहतूक प्रशासनावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. तसेच भारतात प्रशिक्षित चालकांची कमतरता असल्याचे गडकरींनी सांगितले. दरम्यान, काल गडकरींनी माझ्या विभागाने अनेक प्रयत्न केलेत; परंतु वाहन अधिनियम विधेयक गेल्या पाच वर्षांपासून संसदेत मंजूर करवून घेता आले नाही, अशी खंत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. मी स्वत: अपघातग्रस्त होतो. पाय चार ठिकाणी मोडला होता. माझी वेदना समजून घ्या. सर्वांच्या आक्षेपांना मी उत्तर देईन. या विधेयकामुळे राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप होणार नाही, लोकहितासाठी यास सहकार्य करा, अशी कळकळीची विनंती गडकरी यांनी लोकसभेत केली.

काय म्हणाले गडकरी?दरवर्षी अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू तर पाच लाख जखमी होतात. एकाच व्यक्तीला दिल्ली, जयपूर, मुंबईतही वाहन परवाना मिळतो. कारण जगात केवळ भारतातच परवाना सर्वात सोप्या पद्धतीने मिळते. लोकांमध्ये कायद्याविषयी सन्मान, भीती नाही. लोक दंडाला घाबरत नाहीत. पाच वर्षांत साडेतीन चार टक्के अपघात कमी झालेत.तामिळनाडूने प्रयोग करुन १५ टक्क्यांपर्यंत अपघात कमी केले. हा राजकीय मुद्दा नाही. लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादIndian Armyभारतीय जवान