शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

दर दोन दिवसांमागे एका दहशतवाद्याला ठार केले; लोकसभेत मांडला लेखाजोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 13:58 IST

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून दहशतवादी हल्ले वाढले होते.

नवी दिल्ली : सर्जिकल आणि एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडलेले असताना मोदी सरकारच्या काळात किती दहशतवादी मारले गेले याचा आकडाच गृहमंत्रालयाने लोकसभेत दिला आहे. जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीच्या घटनांमध्ये 2018 पेक्षा 43 टक्क्यांनी कमी आली आहे. यानुसार 2014 पासून 963 दहशतवादी मारले गेले आहेत. 

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून दहशतवादी हल्ले वाढले होते. पठाणकोट, पुलवामा हल्ले हे या काळातील मोठे हल्ले होते. यानंतर मोदी सरकारने ऑपरेशन ऑलआऊट सुरू करत काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली होती. यामध्ये अनेक संघटनांचे भारतातील म्होरके मारले गेले आहेत. दर दोन दिवसाला एक दहशतवादी मारला गेला असून दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्यूत्तर देताना 413 जवान शहीद झाले आहेत, अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे. 

चांगली सेवा हवी असेल तर पैसे मोजारस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्रालयांच्या अनुदानावर झालेल्या चर्चेवेळी मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी जर तुम्हाला चांगली सेवा हवी असल्यास पैसे मोजावेच लागतील. रस्ते अपघात कमी करण्यासाठी इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, वाहतूक प्रशासनावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. तसेच भारतात प्रशिक्षित चालकांची कमतरता असल्याचे गडकरींनी सांगितले. दरम्यान, काल गडकरींनी माझ्या विभागाने अनेक प्रयत्न केलेत; परंतु वाहन अधिनियम विधेयक गेल्या पाच वर्षांपासून संसदेत मंजूर करवून घेता आले नाही, अशी खंत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. मी स्वत: अपघातग्रस्त होतो. पाय चार ठिकाणी मोडला होता. माझी वेदना समजून घ्या. सर्वांच्या आक्षेपांना मी उत्तर देईन. या विधेयकामुळे राज्यांच्या कारभारात हस्तक्षेप होणार नाही, लोकहितासाठी यास सहकार्य करा, अशी कळकळीची विनंती गडकरी यांनी लोकसभेत केली.

काय म्हणाले गडकरी?दरवर्षी अपघातात दीड लाख लोकांचा मृत्यू तर पाच लाख जखमी होतात. एकाच व्यक्तीला दिल्ली, जयपूर, मुंबईतही वाहन परवाना मिळतो. कारण जगात केवळ भारतातच परवाना सर्वात सोप्या पद्धतीने मिळते. लोकांमध्ये कायद्याविषयी सन्मान, भीती नाही. लोक दंडाला घाबरत नाहीत. पाच वर्षांत साडेतीन चार टक्के अपघात कमी झालेत.तामिळनाडूने प्रयोग करुन १५ टक्क्यांपर्यंत अपघात कमी केले. हा राजकीय मुद्दा नाही. लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादIndian Armyभारतीय जवान