शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

Arvind Kejriwal Supreme Court : प्रत्येक राज्य पंतप्रधानांकडे वडिलांप्रमाणे पाहतं, ‘सर्वोच्च’ निकालानंतर अरविंद केंजरीवालांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 18:09 IST

दिल्लीत केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यादरम्यान सुरू असलेल्या वादावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला.

दिल्लीत केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यादरम्यान सुरू असलेल्या वादावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. दिल्लीतील खरा बॉस म्हणजे निवडून आलेलं सरकारच आहे, असं एका आदेशात सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल माध्यमांशी बोलताना हा निर्णय आपला सर्वात मोठा विजय असल्याचं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा अनेक अर्थाने ऐतिहासिक आदेश आहे. हा दिल्लीतील जनतेचा मोठा विजय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

“सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या लोकांसोबत आज न्याय केला. सेवांची सुरुवात केल्यानंतर आता नवी पदं सुरू करता येतील. यासोबतच कोणत्याही विभागात किंवा कोणताही अधिकारी भ्रष्टाचार करत असेल तर अशा प्रकरणी विजिलेंसची कारवाई होईल,” असं केजरीवाल म्हणाले. यासोबतच त्यांनी दिल्लीच्या जनतेचे आभारही मानले. यावेळी त्यांना नायब राज्यपालांबाबत सवाल करण्यात आला. यावर बोलताना आता त्यांचाच आशीर्वाद घ्यायला चाललो असल्याचंही ते म्हणाले.

आता जबाबादरी पूर्ण करण्याची पॉवर

“जबाबदारी आधीही होती, आता जबाबदारी वाढली आहे. आता जबाबदारीची पॉवर देण्यात आली आहे. ही पॉवर सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. अनेक निर्णय घेण्यात आले, पण ते अंमलात आणण्यापासून रोखलं गेलं,” असं त्यांनी सांगितलं. 

२०१५ मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर ३ महिन्यांच्या आतच पंतप्रधानांनी आदेश देत प्रकरणं नायब राज्यपालांना दिली. याचा अर्थ हा झाला की दिल्ली सरकारमध्ये काम करणारे जितकेही अधिकारी आणि कर्मचारी आहेत, ते निवडलेल्या सराकरच्या अधिकारात नसतील. आम्ही शिक्षण सचिवांचीही नियुक्ती करू शकत नाही. मोदी सर्व देशाचे पंतप्रधान आहेत. ते आमचेही पंतप्रधान आहे. पंतप्रधान वडिलांप्रमाणे असतात. सर्व मुलांचं पालन-पोषण करणं ही वडिलांची जबाबदारी असते. कठिण काळात ते आमची मदत करतील अशी अपेक्षा असते. परंतु ८ वर्षांत आपल्याला कोणत्याही अधिकाराशिवाय काम करावं लागल्याचं केजरीवाल म्हणाले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय