शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

अरुणाचल प्रदेशातील गावाचं नशीब पालटलं, एका रात्रीत अख्खं गाव झालं करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 9:21 AM

अरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब आज करोडपती झालं आहे

गुवाहाटी - अरुणाचल प्रदेशातील एका गावातील प्रत्येक कुटुंब आज करोडपती झालं आहे. तुमचा विश्वास बसत नसेल, पण हे अगदी खरं आहे. बोमजा असं या गावाचं नाव आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबाकडे आज करोडो रुपये आहेत. आता हे नेमकं कसं झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर झालं असं की, बोमजा गाव चीन आणि भूतानच्या सीमेलगत तवांग जिल्ह्यात आहे. भारतीय लष्कराला या गावात आपला तळ उभारायचा आहे त्यामुळे त्यांनी गावाची 200 एकर जमीन अधिग्रहण केली आहे. संरक्षण मंत्रालयाने या जमिनीच्या मोबदल्यात गावाला 40.80 कोटींहून जास्त रक्कम दिली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गावात फक्त 31 कुटुंबं राहतात, त्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला एक कोटीहून जास्त रक्कम येत आहे. 

एका कुटुंबाला सर्वात जास्त 6.73 कोटींचा मोबदला मिळाला आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गावक-यांना त्यांच्या हक्काची रक्कम सुपूर्त केली आहे. यासोबतच आशियातील समृद्ध गावांच्या यादीत बोमजा गावाचा समावेश झाला आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माढापूर गावात सर्वात जास्त समृद्ध गाव मानलं जातं. सीमेवरील चीनच्या वाढत्या हालचाली पाहता भारतानेही या ठिकाणी विकासाच्या योजना आणि कामे सुरु केली आहेत. 

बोमजा गावातील 31 कुटुंबांपैकी 29 कुटुंबांना 1.09 कोटी रुपये मोबदला म्हणून मिळाले आहेत. उर्वरित दोन कुटुंबांपैकी एका कुटुंबाला 2.45 कोटी, तर दुस-या कुटुंबाला 6.73 कोटींचा मोबदला देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अरुणाचल प्रदेश योग्य दिशा आणि प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचं मुख्यमंत्री पेमा खांडू बोलले आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने राज्याच्या विकासाला गती मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. खासकरुन रेल्वे, हवाई मार्ग आणि रस्त्यांच्या विकासावर लक्ष दिलं जात असून डिजिटल क्षेत्रातही राज्य विकास करत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश