शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आता मणिपूरमध्ये प्रत्येक गुन्ह्याचा हिशेब होणार, CBI नं तपासासाठी उतरवले 29 महिला अधिकाऱ्यांसह 53 अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 08:48 IST

मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचारांसंदर्भात 6500 हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यांपैकी 11 घटना अति संवेदनशील आहेत. यांच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे.

मणिपुरमध्ये  सीबीआय चौकशीच्या घेऱ्यात आलेल्या सुरुवातीच्या 11 प्रकरणांच्या तपासासाठी डीआयजी स्तरावरील तीन अधिकाऱ्यासंह 53 अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यात दोन महिला डीआयजी रँकच्या अधिकाऱ्यांसह 29 महिला अधिकारी/कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचारांसंदर्भात 6500 हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यांपैकी 11 घटना अति संवेदनशील आहेत. यांच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. केंद्र आणि मणिपूर सरकारने ही प्रकरणे मणिपूर पोलिसांकडून काढून सीबीआयला सोपवण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली होती. 

पंतप्रधानांनी आपल्या भाषणातही केला होता उल्लेख - स्वतंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकावल्यानंतर, देशाला संबोधित करताना,"गेल्या काही आठवड्यांत इशान्य भारतात विशेषतः मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आई-बहिणींच्या सन्मानासोबत जो प्रकार घडला. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शांततेच्या बातम्या येत आहे. देश मणिपूरच्या नागरिकांसोबत आहे. मणीपूरने गेल्या काही दिवसांत जी शांतता राखली आहे. तशीच राखावी, कारण यातूनच समाधानाचा मार्ग निघेल. यासाठी सरकारही योग्य ते प्रयत्न करत आहे आणि करत राहील.  

मणिपूर वादाची कारणे काय? - - कुकी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा आहे. आता मैतेई लोकही अनुसूचित जमातीचा दर्जा मागत आहेत.- नागा आणि कुकी समुदायाचे म्हणणे आहे की, सर्व विकासाचा फायदा मूल निवासी मैतेईच घेतात. अधिकांश कुकी म्यानमारमधून आले आहेत.- मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील या परिस्थितिसाठी म्यानमारमधून होणारी घुसखोरी आणि अवैध शस्त्रे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. कुकी समुदायाला जवळपास 200 वर्ष राज्याचे संरक्षण मिळाले आहे. अनेक इतिहासकारांच्यामते इंग्रजांनी कुकी लोकांना नागांविरुद्ध आणले आहे.- जेव्हा नाग लोक इंग्रजांवर हल्ले करत होते, तेव्हा हेच कुकी लोक इंग्रजांचा बचाव करत होते. यानंतर बहुतेकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, यामुळे त्यांना अधिक फायदा मिळाला आणि एसटीचा दर्जाही मिळाला. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारCBIगुन्हा अन्वेषण विभागWomenमहिला