शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

‘कवच’ही रोखू शकले नसते अपघात; ‘कोरोमंडल’च्या लोको पायलटला ‘क्लीन चिट’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 05:22 IST

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितला घटनाक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ओडिशातील किमान २७५ प्रवाशांचा बळी घेणाऱ्या तिहेरी रेल्वे अपघातात चालकाची चूक किंवा यंत्रणा अपयशी ठरली नाही, असे सांगून रेल्वे अधिकाऱ्यांनी कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकाला एकप्रकारे क्लीन चिट दिली. हा अपघात फक्त एकाच रेल्वेचा झाला, ‘कवच’ यंत्रणा कुचकामी ठरली असती. रेल्वे वेगात असल्याने प्रतिक्रिया वेळ खूपच कमी होता, त्याला अपयश म्हणणे योग्य होणार नाही, असे रेल्वे मंडळाच्या अधिकारी जया सिन्हा म्हणाल्या.

वर्मा यांनी सांगितले, की बहनगा बाजार रेल्वेस्थानकावर ‘लूप लाइन’वर लोहखनिजाने भरलेल्या मालगाड्या होत्या. दोन्ही मुख्य मार्गांवर सिग्नल हिरवा होता. म्हणजेच, निर्धारित वेगमर्यादेने गाडीच तो चालवू शकत होता. कोरोमंडल एक्स्प्रेस १२८ किमी प्रतितास आणि दुसरी पॅसेंजर १२६ किमी प्रतितास वेगाने जात होती. निर्धारित कमाल मर्यादा १३० किमी प्रतितास असल्याने निर्धारित वेगाचे उल्लंघन चालकाकडून झालेले नाही.

प्रियजनांना शोधण्याचे अवघड काम

बहनगा हायस्कूलमध्ये मृत प्रवाशांचे फाेटाे असे ठेवण्यात आले होते. ते पाहून नातेवाईक आपल्या आप्तेष्टांची ओळख पटवीत आहेत. तेथे एक जोडपे आपल्या २२ वर्षांच्या तरुण मुलाचा शोध घेण्यासाठी रेल्वे अपघातातील मृतांचे फोटो काळजावर दगड ठेवून पाहत होते. फोटोतील मृताच्या गळ्यात असलेल्या लॉकेटमुळे तो आपलाच मुलगा असल्याची मातेला खात्री पटली आणि इतक्या वेळ रोखून धरलेले अश्रू वाहू लागले.

सध्या फक्त प्राथमिक निष्कर्ष 

सिग्नल यंत्रणा त्रुटीरोधक (एरर प्रूफ) आणि अपयशी न ठरणारी (फेल सेफ) आहे, म्हणजे यंत्रणेत बिघाड झाला तरी सर्व यंत्रणाच ठप्प होते आणि रेल्वे जेथे आहेत, तेथेच थांबतात, असे सिन्हा  म्हणाल्या. हे फक्त प्राथमिक निष्कर्ष आहेत आणि औपचारिक चौकशी संपेपर्यंत ठोस काहीही सांगता येणार नाही, असे सांगत रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेमंत्र्यांचीच री ओढली.

तीन सख्खे भाऊ ठार, अख्खे कुटुंब उद्ध्वस्त 

- कामाच्या शोधात तामिळनाडूला जाणाऱ्या पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील तीन भावांना बालासोर रेल्वे अपघातात आपला जीव गमवावा लागला. 

- बसंती उत्तर येथील चरनिखली गावातील रहिवासी हरण गायन (४०), निशिकांत गायन (३५) आणि दिबाकर गायन (३२) हे वर्षातील बहुतांश वेळा तामिळनाडूत राहून छोटी-मोठी नोकरी करत असत. ते काही दिवसांपूर्वी घरी आले होते.

...अन् अर्धवट राहिली प्रेमाची कविता

- अपघाताच्या ठिकाणी बंगाली भाषेतील प्रेम कविता लिहिलेल्या डायरीतील कागदपत्रे रुळांवर अस्ताव्यस्त पसरलेली आढळली. डायरीच्या फाटलेल्या पानांवर ‘अल्पो अल्पो मेघ थेके हलका ब्रिस्ती है, छोटा छोटा गोलपो थेके भालोबासा सृष्टी आहे...’ विखुरलेल्या ढगांमुळे हलका पाऊस पडतो, (तर) आपण ऐकलेल्या छोट्या छोट्या कथांमधून प्रेम फुलते, असे हा कवी आपल्या कवितेत म्हणतो. 

- आणखी एक अर्धवट कविता ‘भालोबेशी तोके चाय सारखों, अचिच तुझ मोनेर साथ...’ (प्रेमात मला तुझी गरज आहे, सदैव माझ्या मनात तू आहेस...). हा प्रवासी कवी असावा. मात्र, तो अपघातातून बचावला की काय, हे मात्र कळू शकले नाही. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वे