शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

‘कवच’ही रोखू शकले नसते अपघात; ‘कोरोमंडल’च्या लोको पायलटला ‘क्लीन चिट’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 05:22 IST

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितला घटनाक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ओडिशातील किमान २७५ प्रवाशांचा बळी घेणाऱ्या तिहेरी रेल्वे अपघातात चालकाची चूक किंवा यंत्रणा अपयशी ठरली नाही, असे सांगून रेल्वे अधिकाऱ्यांनी कोरोमंडल एक्स्प्रेसच्या चालकाला एकप्रकारे क्लीन चिट दिली. हा अपघात फक्त एकाच रेल्वेचा झाला, ‘कवच’ यंत्रणा कुचकामी ठरली असती. रेल्वे वेगात असल्याने प्रतिक्रिया वेळ खूपच कमी होता, त्याला अपयश म्हणणे योग्य होणार नाही, असे रेल्वे मंडळाच्या अधिकारी जया सिन्हा म्हणाल्या.

वर्मा यांनी सांगितले, की बहनगा बाजार रेल्वेस्थानकावर ‘लूप लाइन’वर लोहखनिजाने भरलेल्या मालगाड्या होत्या. दोन्ही मुख्य मार्गांवर सिग्नल हिरवा होता. म्हणजेच, निर्धारित वेगमर्यादेने गाडीच तो चालवू शकत होता. कोरोमंडल एक्स्प्रेस १२८ किमी प्रतितास आणि दुसरी पॅसेंजर १२६ किमी प्रतितास वेगाने जात होती. निर्धारित कमाल मर्यादा १३० किमी प्रतितास असल्याने निर्धारित वेगाचे उल्लंघन चालकाकडून झालेले नाही.

प्रियजनांना शोधण्याचे अवघड काम

बहनगा हायस्कूलमध्ये मृत प्रवाशांचे फाेटाे असे ठेवण्यात आले होते. ते पाहून नातेवाईक आपल्या आप्तेष्टांची ओळख पटवीत आहेत. तेथे एक जोडपे आपल्या २२ वर्षांच्या तरुण मुलाचा शोध घेण्यासाठी रेल्वे अपघातातील मृतांचे फोटो काळजावर दगड ठेवून पाहत होते. फोटोतील मृताच्या गळ्यात असलेल्या लॉकेटमुळे तो आपलाच मुलगा असल्याची मातेला खात्री पटली आणि इतक्या वेळ रोखून धरलेले अश्रू वाहू लागले.

सध्या फक्त प्राथमिक निष्कर्ष 

सिग्नल यंत्रणा त्रुटीरोधक (एरर प्रूफ) आणि अपयशी न ठरणारी (फेल सेफ) आहे, म्हणजे यंत्रणेत बिघाड झाला तरी सर्व यंत्रणाच ठप्प होते आणि रेल्वे जेथे आहेत, तेथेच थांबतात, असे सिन्हा  म्हणाल्या. हे फक्त प्राथमिक निष्कर्ष आहेत आणि औपचारिक चौकशी संपेपर्यंत ठोस काहीही सांगता येणार नाही, असे सांगत रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेमंत्र्यांचीच री ओढली.

तीन सख्खे भाऊ ठार, अख्खे कुटुंब उद्ध्वस्त 

- कामाच्या शोधात तामिळनाडूला जाणाऱ्या पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील तीन भावांना बालासोर रेल्वे अपघातात आपला जीव गमवावा लागला. 

- बसंती उत्तर येथील चरनिखली गावातील रहिवासी हरण गायन (४०), निशिकांत गायन (३५) आणि दिबाकर गायन (३२) हे वर्षातील बहुतांश वेळा तामिळनाडूत राहून छोटी-मोठी नोकरी करत असत. ते काही दिवसांपूर्वी घरी आले होते.

...अन् अर्धवट राहिली प्रेमाची कविता

- अपघाताच्या ठिकाणी बंगाली भाषेतील प्रेम कविता लिहिलेल्या डायरीतील कागदपत्रे रुळांवर अस्ताव्यस्त पसरलेली आढळली. डायरीच्या फाटलेल्या पानांवर ‘अल्पो अल्पो मेघ थेके हलका ब्रिस्ती है, छोटा छोटा गोलपो थेके भालोबासा सृष्टी आहे...’ विखुरलेल्या ढगांमुळे हलका पाऊस पडतो, (तर) आपण ऐकलेल्या छोट्या छोट्या कथांमधून प्रेम फुलते, असे हा कवी आपल्या कवितेत म्हणतो. 

- आणखी एक अर्धवट कविता ‘भालोबेशी तोके चाय सारखों, अचिच तुझ मोनेर साथ...’ (प्रेमात मला तुझी गरज आहे, सदैव माझ्या मनात तू आहेस...). हा प्रवासी कवी असावा. मात्र, तो अपघातातून बचावला की काय, हे मात्र कळू शकले नाही. 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वे