शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

'...त्याहून निराश म्हणजे UN सभेत मोदींच्या भाषणावर कोणीही टाळी वाजवली नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 08:49 IST

पी चिदंबरम यांनी ट्विट करुन युएनमधील मोदींच्या भाषणावर भाष्य केलंय. त्यामध्ये, मोदींच्या भाषणाची एकप्रकारे खिल्लीच उडविण्याचं काम त्यांनी केलंय.

ठळक मुद्देपी चिदंबरम यांनी ट्विट करुन युएनमधील मोदींच्या भाषणावर भाष्य केलंय. त्यामध्ये, मोदींच्या भाषणाची एकप्रकारे खिल्लीच उडविण्याचं काम त्यांनी केलंय.

न्यूयॉर्क : अफगाणिस्तानचा वापर दहशतवाद व घातपाती कारवायांसाठी  होणार नाही याची जगाने दक्षता घेतली पाहिजे. दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, हा भस्मासुर तुमच्यावरही उलटू शकतो, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्या देशाला दिला. संयुक्त राष्ट्रांच्या ७६व्या आमसभेत शनिवारी केलेल्या भाषणात मोदी यांनी चीनवरही नाव न घेता टीका केली. मात्र, मोदींच्या भाषणावेळी सभागृहात गर्दी नसल्याने माजीमंत्री काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदींना चिमटा काढलाय. 

पी चिदंबरम यांनी ट्विट करुन युएनमधील मोदींच्या भाषणावर भाष्य केलंय. त्यामध्ये, मोदींच्या भाषणाची एकप्रकारे खिल्लीच उडविण्याचं काम त्यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी युएनच्या सर्वसाधारण सभेत भाषण करत असताना सभागृहात फक्त काहीच सीट भरलेले होते. त्यामुळे, मी निराश झालो आहे, त्याहीपेक्षा निराश कुणीही टाळी न वाजवल्याने झालो, असे उपहासात्मक ट्विट पी चिदंबरम यांनी केलं आहे. युएनमधील भारताचे स्थायी सदस्यत्वाचे मिशन मोठ्या प्रमाणात वाढलंय, असेही चिदंबरम यांनी म्हटलं आहे.  

मोदींचा नाव न घेता चीनवर निशाणा

मोदी म्हणाले की, आपले समुद्र हा आपला मोठा वारसा आहे. जागतिक व्यापारासाठी समुद्रमार्ग हे अतिशय महत्त्वाचे आहेत. विस्तारवादी भूमिका घेणाऱ्यांपासून जगाने स्वत:चे रक्षण केले पाहिजे. जागतिक कायदे, मूल्ये, नियमांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. दहशतवादाचा इतर देशांविरोधात वापर करणाऱ्यांनाही या गोष्टीपासून धोका आहे. योग्यवेळी योग्य काम पूर्ण नाही केले तर ते काम असफल होते, हे आर्य चाणक्य यांचे वचन उद्धृत करत मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कामात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. 

भारताने सर्वात आधी बनविली डीएनए लस 

भारताने जगात सर्वात आधी डीएनए लस विकसित केली. ही लस १२ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला दिली जाऊ शकते. कोरोनाशी मुकाबला करण्याकरिता भारत आरएनए पद्धतीची, तसेच नाकावाटे घेता येणारी लस तयार करण्यात गुंतला आहे. जगातील सर्व लस कंपन्यांनी भारतात उत्पादनांची निर्मिती इथे सुरू करावी, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसAmericaअमेरिकाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघP. Chidambaramपी. चिदंबरम