शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

१९० जागा मिळाल्या तरी भाजप उत्तर प्रदेशात सत्ता टिकवू शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 10:39 IST

UP Election : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय लोक दल, बसप आणि काँग्रेस शाबूत राहू शकणार नाही, असा दावा राज्यातील भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी केला आहे.

व्यंकटेश केसरी

उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीत १९० जागा मिळाल्या तरी भाजप उत्तर प्रदेशात सत्ता टिकवू शकते. कारण, विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय लोक दल, बसप आणि काँग्रेस शाबूत राहू शकणार नाही, असा दावा राज्यातील भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी केला आहे.  सरकारविरोधी भावनेचा भाजपच्या निवडणूक निकालावर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी मान्य केले आहे.

३२५ जागा जिंकून भाजप सहज सरकार स्थापन करील, असा दावा भाजप नेते करीत असले तरी सरकारविरोधी भावना या घटकाकडे दुर्लक्ष करता येेऊ शकत नाही, असे या सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी दौऱ्यात काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केल्याने हिंदुत्व  उत्तर प्रदेशसह देशभरात निश्चितच भक्कम झाले आहे. मध्य उत्तर प्रदेशात (अवध) आणि बुंदेलखंडमध्ये  भाजप आपले वर्चस्व राखू शकते. शेतकरी आंदोलनामुळे  राष्ट्रीय लोकदल समाजवादी पार्टीवर मदत होत असली तरी शेतकरी नेत्यांपेक्षा तेच लाभधारक आहेत, असे मत जाट समुदायाच्या एका भाजप नेत्याने व्यक्त केले. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाला फारसे महत्त्व देत नाहीत.  

आगामी सार्वत्रिक निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही, असे त्यांचे मत आहे. तथापि, जागा घटल्या, तर पक्ष कार्यकर्त्यांच्या नैतिक बळावर परिणाम होईल, या भीतीपोटी भाजप या निवडणुकीला अधिक महत्त्व देत आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या सभांना लक्षणीय गर्दी होत आहे. त्यांनी अनेक इच्छुकांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. परंतु, मुस्लिम आणि यादव समुदायापलीकडे त्यांना आपल्या पक्षाचा जनाधार वाढविता आलेला नाही, असे भाजपच्या एका नेत्याने आणि माजी खासदाराने सांगितले. रालोद, बसप आणि  काँग्रेस या राज्यांतील तीन पक्षांची स्थिती कमकुवतच असल्याने निवडणुकीनंतर त्यांच्यात फूट पडू शकते, असेही या नेत्याने सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ