शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

१९० जागा मिळाल्या तरी भाजप उत्तर प्रदेशात सत्ता टिकवू शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 10:39 IST

UP Election : विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय लोक दल, बसप आणि काँग्रेस शाबूत राहू शकणार नाही, असा दावा राज्यातील भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी केला आहे.

व्यंकटेश केसरी

उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीत १९० जागा मिळाल्या तरी भाजप उत्तर प्रदेशात सत्ता टिकवू शकते. कारण, विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय लोक दल, बसप आणि काँग्रेस शाबूत राहू शकणार नाही, असा दावा राज्यातील भाजपच्या अंतर्गत सूत्रांनी केला आहे.  सरकारविरोधी भावनेचा भाजपच्या निवडणूक निकालावर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी मान्य केले आहे.

३२५ जागा जिंकून भाजप सहज सरकार स्थापन करील, असा दावा भाजप नेते करीत असले तरी सरकारविरोधी भावना या घटकाकडे दुर्लक्ष करता येेऊ शकत नाही, असे या सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी दौऱ्यात काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केल्याने हिंदुत्व  उत्तर प्रदेशसह देशभरात निश्चितच भक्कम झाले आहे. मध्य उत्तर प्रदेशात (अवध) आणि बुंदेलखंडमध्ये  भाजप आपले वर्चस्व राखू शकते. शेतकरी आंदोलनामुळे  राष्ट्रीय लोकदल समाजवादी पार्टीवर मदत होत असली तरी शेतकरी नेत्यांपेक्षा तेच लाभधारक आहेत, असे मत जाट समुदायाच्या एका भाजप नेत्याने व्यक्त केले. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाला फारसे महत्त्व देत नाहीत.  

आगामी सार्वत्रिक निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही, असे त्यांचे मत आहे. तथापि, जागा घटल्या, तर पक्ष कार्यकर्त्यांच्या नैतिक बळावर परिणाम होईल, या भीतीपोटी भाजप या निवडणुकीला अधिक महत्त्व देत आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या सभांना लक्षणीय गर्दी होत आहे. त्यांनी अनेक इच्छुकांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. परंतु, मुस्लिम आणि यादव समुदायापलीकडे त्यांना आपल्या पक्षाचा जनाधार वाढविता आलेला नाही, असे भाजपच्या एका नेत्याने आणि माजी खासदाराने सांगितले. रालोद, बसप आणि  काँग्रेस या राज्यांतील तीन पक्षांची स्थिती कमकुवतच असल्याने निवडणुकीनंतर त्यांच्यात फूट पडू शकते, असेही या नेत्याने सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ