शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ‘लॉकडाऊन’नंतरही जनजीवन टप्प्याटप्प्याने सुरळीत होऊ द्या; मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 06:36 IST

राज्यांनी ‘लॉकडाऊन’नंतरही जनजीवन पूर्ववत करताना परस्परांशी समन्वय ठेवायला हवे.

नवी दिल्ली : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची स्थिती अजूनही समाधानकारक नाही व ही साथ पुन्हा उफाळून येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे सध्याचा देशव्यापी ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतरही राज्यांनी लोकांची गर्दी आणि दाटीवाटीला एकदम वाव न देता जनजीवन टप्प्प्याटप्प्याने सुरु करावे, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केली.

कोरोना रोखण्याचे प्रयत्न व ‘लॉकडाऊन’चे पालन समाधानकारक असले तरी आणखी सतर्कता व शिस्त पाळण्यावर भर देऊन मोदी यांनी म्हणाले की, देशाचे दैनंदिन जनजीवन राज्यांच्या सीमांपुरते मर्यादित नसून परस्परावलंबी आहे. राज्यांनी ‘लॉकडाऊन’नंतरही जनजीवन पूर्ववत करताना परस्परांशी समन्वय ठेवायला हवे. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने बैठक घेऊन मोदींनी ‘लॉकडाऊन’चा तसेच त्यानंतरच्या काळातही कराव्या लागणाऱ्या उपायांचा आढावा घेतला.

राज्यांनी सूचना कराव्यात

सर्वच मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यांतील स्थितीची माहिती दिली व बहुतांश मुख्यमंत्र्यांनी निधीची तसेच साधनसामुग्रीची अजचण येत असल्याने केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. यासाठी ‘लॉकडाऊन’मधून बाहेर पडण्याचे कसे आणि कोणते सामायिक धोरण आखता येईल यावर साकल्याने विचार करून राज्यांनी सूचना कराव्यात, असेही पंतप्रधानांनी सूचविले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी