शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

४ वर्षानंतरही अग्निवीरांची सैन्य दलातील सेवा सुरूच राहिल, सरकारने घातलीय अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 15:30 IST

अग्निवीरांना त्यांच्या ऑपरेशनल अॅप्टीट्युड, हत्यार चालवण्याचं कौशल्य, शारीरिक फिटनेस आणि इतर स्कीलच्या चाचणीत रेटींग देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने सुरु केलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत होणाऱ्या अग्निवीर भरती प्रक्रियेला मोठा विरोध करण्यात आला होता. काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सैन्य दलाचे कंत्राटीकरण होत असल्याच आरोप करत या भरतीप्रक्रियेला विरोध केला. मात्र, त्यानंतरही अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू झाली असून आता उमेदवारांचे प्रशिक्षणही सुरू आहे. त्यात, ४ वर्षांच्या सेवाकालावधीनंतरही उमेदवारांना पुढे सैन्यात नोकरी करता येणार आहे. एक चतुर्थांश उमेदवारांना रिटेन केले जाणार आहे. 

अग्निवीरांना त्यांच्या ऑपरेशनल अॅप्टीट्युड, हत्यार चालवण्याचं कौशल्य, शारीरिक फिटनेस आणि इतर स्कीलच्या चाचणीत रेटींग देण्यात येणार आहे. चार वर्षानंतर या चाचणीतील रेटींगचा परफॉर्मन्स पाहिला जाईल. त्यामध्ये, जे अग्निवीर पात्र ठरतील, ज्यांचा परफॉर्मन्स बेस्ट राहिल, त्यांना पुढील १५ वर्षे सैन्य दलात सेवा करण्याची संधी देण्यात येणार आहे. इतर अग्निवीरांना सैन्यातून रिलीज केले जाईल. या ४ वर्षांच्या कार्यकाळात ज्या अग्निवीरांच्या छातीवर वीरता मेडल लागले जातील, त्यांनाच पुढील सेवेसाठी प्राधान्य दिले जाईल, असे हिंदुस्तान टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

रेटींग प्रणातील सर्वाधिक महत्त्व हे ऑपरेशनल अॅप्टीट्युडला दिले जाईल. दरवर्षी चेन ऑफ कमांडद्वारे याचे आकलन केला जाईल. याचे योगदान ३९ टक्के असणार आहे. 

अशी राहिल गुणवत्ता चाचणी

फिजिकल फिटनेस, फायरींग आणि ड्रीलचे क्वांटिफाईड टेस्ट दोन वर्षात एकदा घेतली जाईल. याचे योगदान ३६ टक्के असेल. 

पहिल्या आणि चौथ्या वर्षी अग्निवीरांना वेगवेगळ्या चाचणींतून निवडण्यासाठी एक स्वतंत्र स्क्रिनिंग बोर्ड असणार आहे. ज्याचे योगदान २५ टक्के असेल. 

गॅलंट्री अवॉर्ड जिंकणाऱ्या अग्निवीरांना अधिकचे म्हणजेच एक्स्ट्रा मार्क दिले जाणार आहेत. शिस्तपालन न केल्यास किंवा बेशिस्तपणा दाखवल्यास निगेटीव्ह मार्कही दिले जाणार आहे.  

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकjobनोकरी