शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

४ वर्षानंतरही अग्निवीरांची सैन्य दलातील सेवा सुरूच राहिल, सरकारने घातलीय अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 15:30 IST

अग्निवीरांना त्यांच्या ऑपरेशनल अॅप्टीट्युड, हत्यार चालवण्याचं कौशल्य, शारीरिक फिटनेस आणि इतर स्कीलच्या चाचणीत रेटींग देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने सुरु केलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत होणाऱ्या अग्निवीर भरती प्रक्रियेला मोठा विरोध करण्यात आला होता. काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सैन्य दलाचे कंत्राटीकरण होत असल्याच आरोप करत या भरतीप्रक्रियेला विरोध केला. मात्र, त्यानंतरही अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू झाली असून आता उमेदवारांचे प्रशिक्षणही सुरू आहे. त्यात, ४ वर्षांच्या सेवाकालावधीनंतरही उमेदवारांना पुढे सैन्यात नोकरी करता येणार आहे. एक चतुर्थांश उमेदवारांना रिटेन केले जाणार आहे. 

अग्निवीरांना त्यांच्या ऑपरेशनल अॅप्टीट्युड, हत्यार चालवण्याचं कौशल्य, शारीरिक फिटनेस आणि इतर स्कीलच्या चाचणीत रेटींग देण्यात येणार आहे. चार वर्षानंतर या चाचणीतील रेटींगचा परफॉर्मन्स पाहिला जाईल. त्यामध्ये, जे अग्निवीर पात्र ठरतील, ज्यांचा परफॉर्मन्स बेस्ट राहिल, त्यांना पुढील १५ वर्षे सैन्य दलात सेवा करण्याची संधी देण्यात येणार आहे. इतर अग्निवीरांना सैन्यातून रिलीज केले जाईल. या ४ वर्षांच्या कार्यकाळात ज्या अग्निवीरांच्या छातीवर वीरता मेडल लागले जातील, त्यांनाच पुढील सेवेसाठी प्राधान्य दिले जाईल, असे हिंदुस्तान टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

रेटींग प्रणातील सर्वाधिक महत्त्व हे ऑपरेशनल अॅप्टीट्युडला दिले जाईल. दरवर्षी चेन ऑफ कमांडद्वारे याचे आकलन केला जाईल. याचे योगदान ३९ टक्के असणार आहे. 

अशी राहिल गुणवत्ता चाचणी

फिजिकल फिटनेस, फायरींग आणि ड्रीलचे क्वांटिफाईड टेस्ट दोन वर्षात एकदा घेतली जाईल. याचे योगदान ३६ टक्के असेल. 

पहिल्या आणि चौथ्या वर्षी अग्निवीरांना वेगवेगळ्या चाचणींतून निवडण्यासाठी एक स्वतंत्र स्क्रिनिंग बोर्ड असणार आहे. ज्याचे योगदान २५ टक्के असेल. 

गॅलंट्री अवॉर्ड जिंकणाऱ्या अग्निवीरांना अधिकचे म्हणजेच एक्स्ट्रा मार्क दिले जाणार आहेत. शिस्तपालन न केल्यास किंवा बेशिस्तपणा दाखवल्यास निगेटीव्ह मार्कही दिले जाणार आहे.  

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकjobनोकरी