शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

"10 पक्ष एकत्र लढले असते तरी...!" दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांचं मोठं विधान, स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 01:36 IST

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील I.N.D.I.A. सोबत निवडणूक लढणाऱ्या आपने दिल्लीतही आघाडी करून निवडणूक लढली असती, तर निकाल काही वेगळे आला असता, असे काही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात आता काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी मोठे विधान केले आहे.

गेल्या १२ वर्षांपासून दिल्लीत सत्तेवर असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला आहे. तर भाजपला मोठा विजय मिळाला आहे. मात्र याच वेळी, काँग्रेसला मात्र आपले खातेही उघडता आलेले नाही. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील I.N.D.I.A. सोबत निवडणूक लढणाऱ्या आपने दिल्लीतही आघाडी करून निवडणूक लढली असती, तर निकाल काही वेगळे आला असता, असे काही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात आता काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी मोठे विधान केले आहे.

काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, दिल्लीतील जनतेने कुणालाही हरवले नाही. तर केजरीवाल यांना पदावरून दूर केले आहे. AAP-काँग्रेस आघाडीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, दिल्लीत 10 पक्ष जरी त्यांच्यासोबत असते, तरीही त्यांचा पराभव निश्चित होता. कारण दिल्लीने अरविंद केजरीवाल यांना सत्तेवरून हटवण्याचा निर्णय आधीच घेतलेला होता. 

काय म्हणाले संदीप दीक्षित? -काँग्रेस नेते दिक्षित म्हणाले, "दिल्लीतील जनतेने कुणालाही हरवलेले नाही. उलट त्यांनी अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले आहे. जर आम्ही (आप आणि काँग्रेस) एकत्रितपणे निवडणूक लढवली असती, तर निकाल आणखी वाईट आले असते. दिल्लीतील जनतेने अरविंद केजरीवाल यांना हटवण्याचे निश्चित केले होते. त्यांच्या सोबत १० पक्ष असते तरीही ते हरलेच असते.

48 जागांवर भाजपचा विजय -दिल्लीतील ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले आणि ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत, भारतीय जनता पक्षाने ४८ जागा जिंकत प्रचंड विजय मिळवला. आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या, तर काँग्रेससह इतर पक्षांना खातेही उघडता आले नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Aam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपBJPभाजपा