शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

ESIC News: केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देणार, ही योजना बंद होणार, असा परिणाम होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 15:18 IST

ESIC News: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्याची तयारी केंद्र सरकराने केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली. कोविड-१९ रिलिफ स्कीम मार्च महिन्यामध्ये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली - सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्याची तयारी केंद्र सरकराने केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली. कोविड-१९ रिलिफ स्कीम मार्च महिन्यामध्ये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने ही योजना २४ मार्च २०२० रोजी दोन वर्षांसाठी सुरू केली होती. तेव्हापासून ही योजना सुरू आहे. तिला या मार्च महिन्यामध्ये दोन वर्षे पूर्ण होणार आहेत.

कर्मचारी राज्य विमा निगमच्या गव्हर्निंग बॉडीची बैठक हल्लीच झाली होती. ईएसआयसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत कोविडबाबतच्या मदत योजना पुढे सुरू ठेवण्याची गरज नाही. या बैठकीमध्ये कामगारमंत्र्यांनी सांगितले की, ईएसआयसी रुग्णालयांकडून श्रमिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू राहील. तसेच फॅक्टरी-एमएसएमई क्लस्टरला एक युनिट मानले जाईल.

देशात कोरोनाचा फैलाव सुरू झालयावर ईएसआयसीअंतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाटी ही योजना सुरू करण्यात आली होती. कुठल्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जात होती. दरम्यान, ईएसआयसीशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या मते ही योजना अजून एक वर्ष सुरू राहावी, अशी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची माहिती होती. त्यांच्या मते कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. अजूनही देशात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मात्र कामगार मंत्र्यांनी कोरोनाचा धोका आता तितकासा राहिला नसल्याचे सांगत आरोग्य मंत्र्यांनी ही योजना पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला होता.  

टॅग्स :Employeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या