शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ESIC News: केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देणार, ही योजना बंद होणार, असा परिणाम होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 15:18 IST

ESIC News: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्याची तयारी केंद्र सरकराने केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली. कोविड-१९ रिलिफ स्कीम मार्च महिन्यामध्ये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली - सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देण्याची तयारी केंद्र सरकराने केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली. कोविड-१९ रिलिफ स्कीम मार्च महिन्यामध्ये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने ही योजना २४ मार्च २०२० रोजी दोन वर्षांसाठी सुरू केली होती. तेव्हापासून ही योजना सुरू आहे. तिला या मार्च महिन्यामध्ये दोन वर्षे पूर्ण होणार आहेत.

कर्मचारी राज्य विमा निगमच्या गव्हर्निंग बॉडीची बैठक हल्लीच झाली होती. ईएसआयसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत कोविडबाबतच्या मदत योजना पुढे सुरू ठेवण्याची गरज नाही. या बैठकीमध्ये कामगारमंत्र्यांनी सांगितले की, ईएसआयसी रुग्णालयांकडून श्रमिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू राहील. तसेच फॅक्टरी-एमएसएमई क्लस्टरला एक युनिट मानले जाईल.

देशात कोरोनाचा फैलाव सुरू झालयावर ईएसआयसीअंतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाटी ही योजना सुरू करण्यात आली होती. कुठल्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जात होती. दरम्यान, ईएसआयसीशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या मते ही योजना अजून एक वर्ष सुरू राहावी, अशी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची माहिती होती. त्यांच्या मते कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. अजूनही देशात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मात्र कामगार मंत्र्यांनी कोरोनाचा धोका आता तितकासा राहिला नसल्याचे सांगत आरोग्य मंत्र्यांनी ही योजना पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला होता.  

टॅग्स :Employeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या