शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 10:39 IST

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ६-७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला

नवी दिल्ली - भारताजवळपाकिस्तानात आत घुसून अचूक हल्ला करण्याची ताकद आहे. मग ते रावलपिंडी असो वा खैबर पख्तूनख्वा अथवा कुठलाही भाग असेल अशा शब्दात भारतीय वायू सेनेचे महासंचालक लेफ्टिनंट जनरल सुमेर इवान डी कुन्हा यांनी सैन्याच्या क्षमतेवर भाष्य केले आहे. पूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये आहे जर पाकिस्तानी सैन्याने त्यांचे मुख्यालय रावलपिंडीहून केपीकेला शिफ्ट केले तरीही त्यांना लपायला जागा शोधावी लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने काय केले?

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ६-७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या काळात सैन्याने लोइटरिंग म्यूनिशन, लॉन्ग रेंज ड्रोन आणि गाइडेड शस्त्रांचा प्रभावी वापर केला. लश्कर आणि जैशचे मुख्यालय, घुसखोरांच्या चौक्या, कंट्रोल रूम नष्ट केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. ज्यातील काही प्रमुख दहशतवादी भारताच्या हल्ल्यात समाविष्ट होते. 

भारतीय सैन्याची रणनीती

भारताच्या सैन्याने आपला विचार बदलला आहे. आता आम्ही सहन करत नाही तर उलट अचूक वेळी योग्य ठिकाणी प्रत्युत्तर देण्याचे धोरण अवलंबतो. जोपर्यंत सीमा पार होत नाही तोपर्यंत आम्ही सहन करतो, परंतु रेषा पार केली तर आम्ही निर्णायक कार्यवाही करतो. या रणनीतीत भारताने जगालाही संदेश दिला आहे. आता यापुढे दहशतवादाविरोधात बचावात्मक नाही तर आक्रमक पवित्रा घेतला जाणार आहे असं लेफ्टिनंट जनरल डी कुन्हा यांनी सांगितले.

आत्मनिर्भर सैन्य तंत्रज्ञान 

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने स्वदेशी तंत्रज्ञान आणि सैन्य तुकड्यांमध्ये समन्वय साधला. भारतीय सैन्याने ड्रोन डिटेक्शन आणि इंटरसेप्शन सिस्टमने शत्रूचे हल्ले परतावून लावले. लॉन्ग रेंज मिसाईलने दहशतवादी तळांना कुठल्याही नागरी ढाच्याचा नुकसान न पोहचवता यूनिफाइड कमान संरचनेतंर्गत वायूसेना, लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनी एकत्रित काम केले. आम्ही केवळ सीमेचे रक्षण केले नाही तर छावण्या, नागरीक क्षेत्र आणि आमच्या जवानांच्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवले. हाच आमचा विजय आहे असं लेफ्टिनंट जनरल डी कुन्हा यांनी म्हटलं. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर