शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
4
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
5
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
6
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
7
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
8
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
9
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
10
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
11
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
12
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
13
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
14
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
15
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
16
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
17
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
18
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
19
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
20
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी

संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 10:39 IST

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ६-७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला

नवी दिल्ली - भारताजवळपाकिस्तानात आत घुसून अचूक हल्ला करण्याची ताकद आहे. मग ते रावलपिंडी असो वा खैबर पख्तूनख्वा अथवा कुठलाही भाग असेल अशा शब्दात भारतीय वायू सेनेचे महासंचालक लेफ्टिनंट जनरल सुमेर इवान डी कुन्हा यांनी सैन्याच्या क्षमतेवर भाष्य केले आहे. पूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये आहे जर पाकिस्तानी सैन्याने त्यांचे मुख्यालय रावलपिंडीहून केपीकेला शिफ्ट केले तरीही त्यांना लपायला जागा शोधावी लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने काय केले?

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ६-७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या काळात सैन्याने लोइटरिंग म्यूनिशन, लॉन्ग रेंज ड्रोन आणि गाइडेड शस्त्रांचा प्रभावी वापर केला. लश्कर आणि जैशचे मुख्यालय, घुसखोरांच्या चौक्या, कंट्रोल रूम नष्ट केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. ज्यातील काही प्रमुख दहशतवादी भारताच्या हल्ल्यात समाविष्ट होते. 

भारतीय सैन्याची रणनीती

भारताच्या सैन्याने आपला विचार बदलला आहे. आता आम्ही सहन करत नाही तर उलट अचूक वेळी योग्य ठिकाणी प्रत्युत्तर देण्याचे धोरण अवलंबतो. जोपर्यंत सीमा पार होत नाही तोपर्यंत आम्ही सहन करतो, परंतु रेषा पार केली तर आम्ही निर्णायक कार्यवाही करतो. या रणनीतीत भारताने जगालाही संदेश दिला आहे. आता यापुढे दहशतवादाविरोधात बचावात्मक नाही तर आक्रमक पवित्रा घेतला जाणार आहे असं लेफ्टिनंट जनरल डी कुन्हा यांनी सांगितले.

आत्मनिर्भर सैन्य तंत्रज्ञान 

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने स्वदेशी तंत्रज्ञान आणि सैन्य तुकड्यांमध्ये समन्वय साधला. भारतीय सैन्याने ड्रोन डिटेक्शन आणि इंटरसेप्शन सिस्टमने शत्रूचे हल्ले परतावून लावले. लॉन्ग रेंज मिसाईलने दहशतवादी तळांना कुठल्याही नागरी ढाच्याचा नुकसान न पोहचवता यूनिफाइड कमान संरचनेतंर्गत वायूसेना, लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनी एकत्रित काम केले. आम्ही केवळ सीमेचे रक्षण केले नाही तर छावण्या, नागरीक क्षेत्र आणि आमच्या जवानांच्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवले. हाच आमचा विजय आहे असं लेफ्टिनंट जनरल डी कुन्हा यांनी म्हटलं. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर