शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

झारखंडमधील चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 14:20 IST

झारखंडमधील डुमका येथे रविवारी (2 जून) सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात  सुरक्षा दलाला यश आले आहे.

ठळक मुद्देझारखंडमधील डुमका येथे रविवारी सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत.

दुमका - झारखंडमधील डुमका येथे रविवारी (2 जून) सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात  सुरक्षा दलाला यश आले आहे. तर यामध्ये एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील डुमका येथे चकमक झाली. रानेश्वर ठाण्याच्या हद्दीत कठलियाजवळ ही चकमक झाली. चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यावेळी चार जवान जखमी झाले तर एक जवान शहीद झाला. नक्षलवाद्यांशी लढताना गंभीर जखमी झालेल्या एका जवानाला हेलिकॉप्टरने रांची येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर इतर तीन जवानांवर दुमका येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस अधीक्षक वाय. एस. रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिकारीपाडा आणि रानेश्वर ठाण्याच्या हद्दीतील जंगलात 15 ते 20 नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाच्या जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

आंध्र प्रदेशातील कोरापूरच्या पडुवा जंगलात काही दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये तीन महिलांचा समावेश होता. चकमकीदरम्यान सुरक्षा रक्षकांनी नक्षवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त केली होती. आंध्र प्रदेशच्या सीमेवर कोरापूरजवळील जंगलात काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा रक्षकांनी जंगल परिसरात घेराव घातला. यावेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तर देत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तसेच, नक्षलवाद्यांनी आपल्या कमांडरना वाचविण्यासाठी सगल सहा आयईडी स्फोट केले होते.  

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. दंतेवाडात जिल्हा राखीव सैनिक (डीआरजी) व विशेष कृती दलाच्या जवानांनी गोंदरस जंगलात ही संयुक्त कारवाई केली. अरनपूरजवळ असलेल्या गोंदरसच्या जंगलात ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पहिल्यांदाच महिला कमांडो सहभागी झाल्या होत्या. घटनास्थळावरून एक रायफल, 12 बंदुकांसह मोठ्या प्रमाणात दारू गोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. 

याशिवाय, छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (21 एप्रिल) चकमक झाली होती. छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. बिजापूर येथे सकाळी सर्च ऑपरेशन सुरू असताना जंगलात लपून बसलेल्या काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला होता. चकमकीदरम्यान दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले होते. 

 

टॅग्स :Jharkhandझारखंडnaxaliteनक्षलवादी