शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

जाहीरनाम्यांमध्ये पर्यावरणावर भर! राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टिकोनात झाला चांगला बदल, तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 09:49 IST

वन आणि वन्यजीव रक्षण यासह काही बाबींमध्ये केंद्र सरकारने घेतलेले निर्णय व राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने यात विरोधाभास आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दोन दशकांपूर्वी काँग्रेस, भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांच्या जाहीरनाम्यात पर्यावरण या विषयाबद्दल काही ओळीच असायच्या; पण आता हवामान बदल, पर्यावरणाचे झालेले नुकसान याबद्दल आता काही पाने असतात. हा बदल सुखावह आहे, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले. पर्यावरणाच्या प्रश्नांकडे राजकीय पक्षांनी अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली, हे स्वागतार्ह आहे. या बद्दल विधी सेंटर फॉर लिगल पॉलिसी या संस्थेतील संशोधक देवादित्य सिन्हा यांनी सांगितले की, पर्यावरण धोरणाच्या काही बाबींमध्ये मोठ्या सुधारणा

होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याबद्दल भाजपने आपल्या जाहीरनाम्यात काहीही उल्लेख केलेला नाही. वन आणि वन्यजीव रक्षण यासह काही बाबींमध्ये केंद्र सरकारने घेतलेले निर्णय व राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने यात विरोधाभास आहे. त्यामुळे पर्यावरण व वने यांच्या रक्षणाबाबतची काही आश्वासने ही प्रतीकात्मक ठरली असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांना वाटते. भाजपने आपला ६९ पानांचा जाहीरनामा गेल्या शनिवारी प्रसिद्ध केला. त्यात तीन पाने पर्यावरण, हवामान बदल या विषयाला वाहिलेली आहेत. शाश्वत भारतासाठी मोदी यांची गॅरंटी या विभागात ही पाने समाविष्ट करण्यात आली आहेत.

१९९९च्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात पर्यावरण रक्षणाबद्दल फक्त एक परिच्छेद होता. हवामान बदल हा शब्द भाजपने १९९९ व २००४ साली प्रसिद्ध केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात वापरलाच नव्हता.

हवामान बदलाच्या मुद्द्याला महत्त्वयंदा लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरण, हवामान, आपत्कालीन व्यवस्थापन, पाणी याच्याशी संबंधित मुद्द्यांसाठी दोन पाने राखून ठेवली आहेत. या दोन्ही पक्षांनी गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यांशी तुलना केली असता यंदा त्यांनी हवामान बदल, पर्यावरणीय शाश्वतता या मुद्द्यांना अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४environmentपर्यावरण