शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी, तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 09:35 IST

तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आल्याचेही समजते...

मुंबईवरून केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरमला जात असलेल्या एका विमानात गुरुवारी बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. या धमकीनंतर तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर एकच खळबळ उडाली. यानंतर, तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांना विमानातून बाहेर काढले जात आहे. मात्र, बॉमच्या धमकीने संपूर्ण एअरपोर्टवर प्रचंड गोंधळ उडाला आहे.

यासंदर्भात माहिती देताना एअरपोर्ट प्रशासनाने म्हटले आहे, "एअर इंडिया फ्लाइट 657 तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर लँड झाले आहे. बॉम्बच्या धमकीनंतर इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. संबंधित विमान सध्या आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रवाशांना लवकरच बाहेर काडले जाईल. हे विमान आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आल्याने इतर विमानांना कसल्याही प्रकारचा धोका नाही. ही बॉमची धमकी अफवा तर नाही, यासंदर्भात तपास सुरू आहे. कारण अधिकांश प्रकरणात असेच घडते. 

...अन् एअरपोर्टवर लागू झाली इमरजन्सी -स्थानीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, "विमानाची कसून तपासणी केली जात आहे. मुंबई-तिरुवनंतपुरम फ्लाइटच्या पायलटने विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रणाला बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. यानंतरच विमानतळावर इमर्जन्सी जाहीर करण्यात आली. एअर इंडियाचे विमान सकाळी 8.10 वाजता तिरुअनंतपुरम विमानतळावर उतरणार होते. मात्र, बॉम्बच्या धमकीमुळे ते लवकर आणण्यात आले. मुंबई विमानतळावरून पहाटे 5.45 वाजता या विमानाने उड्डाण केले होते.

विमानात एकूण 135 प्रवासी होते -टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या विमानात एकूण 135 प्रवासी होते. महत्वाचे म्हणजे, पायलटला ही माहिती कुठून मिळाली यासंदर्भात अद्याप काहीही समजू शकलेले नाही. पोलीस चौकशीनंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाMumbaiमुंबईKeralaकेरळBombsस्फोटकेpassengerप्रवासी