शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

मणिपूर मुद्द्यावरून राजकारण लाजिरवाणे; अमित शाह यांचा विरोधकांवर प्रतिहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:43 IST

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, २००८ साली मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावेळी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आल्याचे व त्याद्वारे ते सरकार वाचविल्याचे चित्र लोकसभेने पाहिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत राजकारण करणे ही अतिशय दुर्दैवी व लाजिरवाणी गोष्ट आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर केला. ते म्हणाले की, ५८ निवारा वस्त्यांना सरकार जंगल ग्राम म्हणून घोषित करणार असल्याची २९ एप्रिल रोजी अफवा पसरली. त्यानंतर मणिपूरमध्ये असंतोष निर्माण झाला. 

शाह यांनी सांगितले की, मैतेई समुदाय हा आदिवासी समाज असल्याचा निकाल मणिपूर उच्च न्यायालयाने दिल्याने असंतोष आणखी वाढला. ३ मेपासून मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या होत्या. त्या राज्याचे डीजीपी, मुख्य सचिव बदलले, हवाई दलाच्या विमानाने त्या राज्यात ३५ हजार सैनिक पाठविण्यात आले होते.स्वत:ची सरकारे वाचविण्यासाठी भ्रष्टाचारात गुंतल्यानंतर विरोधी पक्षांच्या आघाडीचा खरा चेहरा सर्वांसमोर आला, असा आरोप शाह यांनी केला.

मोदी सरकारवर जनतेचा विश्वासकेंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, २००८ साली मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावेळी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आल्याचे व त्याद्वारे ते सरकार वाचविल्याचे चित्र लोकसभेने पाहिले आहे. यूपीएचे हे खरे चारित्र्य आहे. मोदी सरकारवर विरोधी पक्षांचा नसेल; पण जनतेचा विश्वास आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील जनतेने खऱ्या अर्थाने ज्या नेत्यावर विश्वास दर्शविला ते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळेच संपूर्ण बहुमताने मोदी सरकार सलग दोनदा केंद्रात सत्तेवर आले. सुमारे ३० वर्षांनंतर संपूर्ण बहुमत असलेले सरकार अस्तित्वात आले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन