शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मणिपूर मुद्द्यावरून राजकारण लाजिरवाणे; अमित शाह यांचा विरोधकांवर प्रतिहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:43 IST

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, २००८ साली मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावेळी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आल्याचे व त्याद्वारे ते सरकार वाचविल्याचे चित्र लोकसभेने पाहिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत राजकारण करणे ही अतिशय दुर्दैवी व लाजिरवाणी गोष्ट आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर केला. ते म्हणाले की, ५८ निवारा वस्त्यांना सरकार जंगल ग्राम म्हणून घोषित करणार असल्याची २९ एप्रिल रोजी अफवा पसरली. त्यानंतर मणिपूरमध्ये असंतोष निर्माण झाला. 

शाह यांनी सांगितले की, मैतेई समुदाय हा आदिवासी समाज असल्याचा निकाल मणिपूर उच्च न्यायालयाने दिल्याने असंतोष आणखी वाढला. ३ मेपासून मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या होत्या. त्या राज्याचे डीजीपी, मुख्य सचिव बदलले, हवाई दलाच्या विमानाने त्या राज्यात ३५ हजार सैनिक पाठविण्यात आले होते.स्वत:ची सरकारे वाचविण्यासाठी भ्रष्टाचारात गुंतल्यानंतर विरोधी पक्षांच्या आघाडीचा खरा चेहरा सर्वांसमोर आला, असा आरोप शाह यांनी केला.

मोदी सरकारवर जनतेचा विश्वासकेंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, २००८ साली मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावेळी काही खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आल्याचे व त्याद्वारे ते सरकार वाचविल्याचे चित्र लोकसभेने पाहिले आहे. यूपीएचे हे खरे चारित्र्य आहे. मोदी सरकारवर विरोधी पक्षांचा नसेल; पण जनतेचा विश्वास आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील जनतेने खऱ्या अर्थाने ज्या नेत्यावर विश्वास दर्शविला ते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळेच संपूर्ण बहुमताने मोदी सरकार सलग दोनदा केंद्रात सत्तेवर आले. सुमारे ३० वर्षांनंतर संपूर्ण बहुमत असलेले सरकार अस्तित्वात आले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन