शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विमानतळाच्या रनवेवर येते मिरवणूक, वर्षांतून १० तास विमानांची उड्डाणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 11:34 IST

मंदिरातून निघालेली भाविकांची यात्रा म्हणजेच मिरवणुकीमुळे हे विमानतळ ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येते

तिरुवअनंतपूरम - केरळच्या तिरुवअनंतपूरम येथील राष्ट्रीय विमानतळ हे कायमच गजबजलेलं असतं. मात्र, वर्षातून दोनवेळा हे विमानतळ ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येतं. मंगळवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत हे विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी, विमानतळावरुन कुठल्याही विमानाचे उड्डाण झाले नाही. विशेष म्हणजे वर्षातून दुसऱ्यांदा ही प्रथा पाळली जाते. कारण, धार्मिक कारणास्तव, परंपरेनुसार हे विमानतळ वर्षातून १० तासांसाठी बंद ठेवण्यात येते. 

मंदिरातून निघालेली भाविकांची यात्रा म्हणजेच मिरवणुकीमुळे हे विमानतळ ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येते. कारण, ही मिरवणूक एअरपोर्टच्या रनवेवरुनच निघते. ज्यामध्ये, हजारो भाविकांसह हत्तींचाही समावेश असतो. विशेष म्हणजे या मिरवणुकीला तब्बल ५ हजार वर्षांची परंपरा आहे. कोरोनापूर्वी म्हणजेच लॉकडाऊनच्या काही दिवस अगोदरही ही मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली होती. या उत्सवासाठी वर्षांतून दोनदा विमानतळ बंद ठेवण्यासाठी विमानतळाकडून एअरमेनला नोटीस पाठविण्यात येतं. त्यानुसार यंदा १ नोव्हेंबर रोजी हा उत्सव होत आहे. त्यासाठी, आज सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत येथील विमानतळावरुन कुठल्याही विमााचे उड्डाण किंवा लँडींग होणार नाही. या वेळांत ४ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह एकूण ६ विमानांचे उड्डाण थांबविण्यात येते. 

वर्षाच्या सुरुवातीला प्रथम मार्च-एप्रिल महिन्यात पेनकुनी उत्सवादरम्यान आणि दुसऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अराट्टू मिरवणूक काढण्यात येते. श्री भगवान विष्णू यांना पद्मनाभ स्वामी मंदिरातून पालखीत बसवून मिरवण्यात येते. विमानतळाच्या पाठीमागे असलेल्या शांघमुघम समुद्रकिनारी नेण्यात येते, तेथे भगवान विष्णूजींना स्नान करवण्यात येते. अशी परंपरा जोसापली जाते. दरम्यान, ही परंपरा ५ हजार वर्षांपूर्वीची असून १९३२ मध्ये येथील विमानतळ बांधण्यात आलं आहे. त्यामुळे, ही पंरपंरा जपत भाविकांच्या श्रद्धेचा आदर करत विमानतळाची सेवा वर्षातून दोनवेळा ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येते. तेव्हाच यासंदर्भात परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :AirportविमानतळairplaneविमानKeralaकेरळ