शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

पुन्हा राज्याचा दर्जा मिळेपर्यंत निवडणूक लढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 04:45 IST

ओमर अब्दुल्ला यांचे प्रतिपादन : अधिकार नसलेल्या विधानसभेचा सदस्य व्हायचे नाही

श्रीनगर : राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करून या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकारी अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी सडकून टीका केली आणि जोपर्यंत जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केला जात नाही तोपर्यंत आपण विधानसभेची निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर केले.

वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ओमर अब्दुल्ला म्हणाले की, निवडणूक न लढविण्याचा माझा निर्णय ही धमकी नाही किंवा ते ‘ब्लॅकमेलिंग’ही नाही. मी नाराजीने असे म्हणतो असेही नाही. ज्या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेला काहाही अधिकार नाहीत त्या विधानसभेचा सदस्य होण्याची माझी इच्छा नाही, असा त्याचा सरळ अर्थ आहे. ते म्हणाले की, मी एका राज्याच्या विधानसभेचा नेता होतो व ती विधानसभा देशात सर्वात जास्त अधिकारसंपन्न होती. आता असणारी केंद्रशासित प्रदेशाची विधानसभा सर्वात अधिकारशून्य विधानसभा असेल. (वृत्तसंस्था)

जनतेसाठी काम करीत राहणारच्तुम्ही हा निर्णय घेण्यापूर्वी त्यावर पक्षात चर्चा केली का, असे विचारता ते म्हणाले की, हे माझे मत आहे व माझा निर्णय आहे. एखाद्याला इच्छा नसताना निवडणूक लढविण्याची बळजबरी कोणीही करू शकत नाही.

च्मात्र, निवडणूक लढविली नाही तर मी नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाच्या माध्यमातून काश्मीरच्या जनतेसाठी यापुढेही काम करीत राहीन, असेही काश्मीरचे पूर्वी मुख्यमंत्री व केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले ५० वर्षांचे अब्दुल्ला म्हणाले.च्ते असेही म्हणाले की, काश्मीरचा राज्याचा दर्जा हिरावून घेताना मोठ-मोठी आश्वासने दिली गेली व नानाविध कारणे दिली गेली; पण त्यापैकी एकाचीही पूर्तता झालेली नाही किंवा त्यापैकी एकही कारण समर्पक असल्याचे दिसून आले नाही.च्ओमर यांचे वडील व पक्षाचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनीही रविवारी अशाच प्रकारची टीका केली होती व केंद्र सरकारने ‘विश्वासघाता’ने हिरावून घेतलेला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करून काश्मिरी जनतेचे मन जिंकावे, असे आवाहन केले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरOmar Abdullahउमर अब्दुल्ला