शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

पुढील वर्षी आठ राज्यांत निवडणुका; पाच राज्यांत विरोधक सत्तेत,  तीन राज्ये टिकवण्याचे भाजपापुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 05:12 IST

हिमाचल प्रदेशचे मतदान संपले आहे आणि गुजरातच्या दुस-या व शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होत असून, दोन्ही राज्यांचे निकाल पुढील सोमवारी, १८ डिसेंबरला लागणार आहेत. त्यानंतर दोन महिन्यांत ईशान्येकडील त्रिपुरा, नागालँड व मिझोरम या राज्यांच्या निवडणुका होतील.

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे मतदान संपले आहे आणि गुजरातच्या दुस-या व शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होत असून, दोन्ही राज्यांचे निकाल पुढील सोमवारी, १८ डिसेंबरला लागणार आहेत. त्यानंतर दोन महिन्यांत ईशान्येकडील त्रिपुरा, नागालँड व मिझोरम या राज्यांच्या निवडणुका होतील. यापैकी एका राज्यांत भाजपाची सत्ता नाही. त्यानंतर मेमध्ये कर्नाटकची निवडणूक असून, तिथे काँग्रेसकडून सत्ता खेचण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल.पुढील वर्षी एकूण आठ राज्यांत निवडणुका होत असून, त्यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपाची सत्ता आहे. गुजरातच्या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने सारी ताकद लावण्याचे कारण वरील तीन राज्यांत पुढील वर्षी सत्ता मिळवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहे. गुजरात निवडणुकांचे निकाल मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडवर पडतील, असे काँग्रेसला वाटत आहे. या तीन राज्यांत नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये निवडणुका होतील. मिझोरमच्या निवडणुकाही नोव्हेंबरातच होतील, अशी अपेक्षा आहे.गुजरातवर सारे अवलंबूनअर्थात काँग्रेसची सारी गणिते, आडाखे हे गुजरातच्या निकालांवर अवलंबून आहे. त्या जिंकता आल्या वा जागांमध्ये चांगली वाढ झाली, तर काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांच्यात हुरूप येईल.पक्षाध्यक्षपदी एकमताने निवड झालेल्या राहुल गांधी यांचीही ताकद गुजरातच्या निवडणुका वाढवतील, असे आताचे तरी चित्र आहे.आसामची पुनरावृत्ती?ईशान्येकडील वरील चारपैकी एकही राज्यात भाजपाची सत्ता नाही. आसाम व अरुणाचल प्रदेशात ज्या पद्धतीने सत्ता मिळवली, तशीच या राज्यांत मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न राहील. मात्र तिथे सध्या भाजपा नसल्यागतच आहे. कर्नाटकही भाजपाला स्वत:कडे हवे आहे. मात्र ते प्रयत्न करताना, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड टिकवणे हेही भाजपापुढे मोठे आव्हान असेल.चौहान यांच्या मागे व्यापमंमध्य प्रदेशात भाजपाचे शिवराम सिंह चौहान हे सलग १२ वर्षे मुख्यमंत्रीपदी आहेत. निवडणुका होतील, तेव्हा त्यांचे १३ वे वर्ष असेल. व्यापमं घोटाळा, शेतकरी आत्महत्या याद्वारे त्यांना अडचणीत आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न राहतील. त्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे. कमलनाथ, दिग्विजय सिंग हे आताच एकत्र आल्याचे दिसत आहे. सलग इतकी वर्षे चौहान सत्तेत असल्याने मतदार पर्याय म्हणून आपल्याला विजयी करतील, असे काँग्रेसला वाटत आहे.रमणसिंग यांची १३ वर्षेछत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग २00३ पासून सत्तेवर आहेत. प्रस्थापित सरकार पक्षाविरोधी वातावरणाचा फायदा मिळावा, असे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. मात्र त्यासाठी राज्यात काँग्रेसने आतापासून करायला हवी, ती जुळवाजुळव सुरू केलेली नाही. शिवाय काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी लोकप्रिय असा चेहरा दिसत नाही.वसुंधरा राजे विरुद्ध अशोक गेहलोतराजस्थानमध्ये मात्र काँग्रेसकडे अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोन नेते आहेत, ज्यांच्या आधारे काँग्रेस विधानसभा निवडणुका भाजपाशी सामना करणार आहे. अशोक गेहलोत हे याआधी दोनदा मुख्यमंत्री होते आणि त्यांची प्रतिमाही चांगली आहे. सचिन पायलट लोकसभा सदस्य आहेत. तिथेभाजपाच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी काँग्रेसला सामना करावा लागणार आहे. त्या २00३ ते २00८ या काळातही मुख्यमंत्री होत्या. आरक्षण, गोरक्षकांचा धुमाकूळ, भाजपा नेत्यांची वसुंधरा राजे यांच्याविषयीची नाराजी याचा फायदा मिळवणे हे काँग्रेसचे लक्ष्य आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक