शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

निवडणूक होण्याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ४ हजार रुपये, महाराष्ट्रात सर्वाधिक अल्पभूधारकांना मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 07:41 IST

केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे शेतक-यांना अर्थसाह्याची जी घोषणा केली, त्यानुसार २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारकांना वर्षाला सहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे शेतक-यांना अर्थसाह्याची जी घोषणा केली, त्यानुसार २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या अल्पभूधारकांना वर्षाला सहा हजार रुपये मदत दिली जाणार आहे. ही योजना १ डिसेंबर, २०१८ पासून लागू होणार आहे. या योजनेनुसार लोकसभा निवडणुकांआधीच शेतकºयांच्या खात्यांवर पहिल्या दोन टप्प्यांत ४ हजार रुपये जमा होणार आहेत.या योजनेचा लाभ मिळविणारे सर्वाधिक अल्पभूधारक महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश व ओडिशामध्ये असून, या राज्यांत जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन ९८ ते १०० टक्के पूर्ण झाले आहे.या योजनेची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी केल्याने, ३१ मार्चपूर्वी शेतकºयांच्या खात्यावर मदतीचा पहिला २ हजार रुपयांचा हप्ता जमा होईल. याची तयारीही पूर्ण झाली आहे, तसेच या वर्षातील मदतीचा पुढचा २ हजारांचा हप्ताही एप्रिलमध्ये जमा होईल. अवघ्या दोन महिन्यांत ४ हजार रुपये मिळणे ही शेतकºयांसाठी आनंदाची बाब ठरेल. शिवाय ही रक्कम लोकसभेचे प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याआधीच जमा होईल.देशात एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकºयांची संख्या ९.९८ कोटी आहे, तर २.५७ कोटी शेतकºयांकडे १ ते २ हेक्टर जमीन आहे. त्याहून अधिकजमीन असलेल्या शेतकºयांची संख्या १.९५ कोटी आहे.गोवा, काश्मीर पिछाडीवरफेब्रुवारी संपण्याआधीच या राज्यांतील जमिनीच्या नोंदींचे संगणकीकरण पूर्ण झाले असेल. काही दिवसांत आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल, गुजरात व राजस्थानातही हे काम पूर्ण होईल. याबाबतीत गोवा व जम्मू-काश्मीर ही राज्ये पिछाडीवर आहेत. तिथे आतापर्यंत अनुक्रमे ५३ व ९ टक्के संगणकीकरण झाले आहे. जमीन नोंदींचे पूर्णपणे डिजिटायझेशन झालेल्या राज्यांना या योजनेचे सर्वाधिक लाभ होतील.अर्थमंत्रालयातील अत्यंत उच्चपदस्थ अधिकाºयाने सांगितले की, १२कोटी अल्पभूधारकांना लाभ मिळावा,या दृष्टीने ही योजना आखली आहे. एप्रिलआधीच २ हजारांचे दोन्ही हप्ते या शेतकºयांच्या खात्यात जमा केले जातील. यासाठी अंतरिम अर्थसंकल्पात २० हजार कोटींची तरतूद केली आहे आणि पुढील वर्षासाठी ७५ हजार कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत.६७% टक्के शेतकºयांपर्यंत पोहोचेल मदत१२ कोटींहून अधिक शेतकºयांना या योजनेतून मदत मिळेल. योजनेतील लाभार्थ्यांचीसंख्या पाहता, मोदी सरकार ६७ टक्के शेतकºयांपर्यंत पोहोचू शकेल. लोकसभेच्या सुमारे ३४२ मतदारसंघांत ही योजना पोहोचेल.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार