शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

UP Election: ... म्हणून योगींची सोडली साथ, निवडणुकांच्या तोंडावर युपीतील मंत्र्यांचा भाजपला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:46 IST

भाजपला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांसोबत जाणारे हे नेते संघाचे किंवा मूळ भाजप पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. सन 2017 च्या निवडणुकीत हे सपा आणि बसपाला सोडून भाजपात आले होते.

शरद गुप्ता, नवी दिल्ली

लखनौ - आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये विविध एजन्सींमार्फत करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणातून भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं दिसत आहे. मात्र, योगी आदित्यनाथ यांच्या मंत्री मंडळातील मंत्री आणि आमदार एकापाठोपाठ एक राजीनामा देत आहेत. भाजपला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षात प्रवेश करत आहेत. भाजपच्या तिसऱ्या मंत्र्याने आज आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. जर सर्वेक्षणातून भाजपला बहुमत दिसत असेल, तर हे आमदार, मंत्री राजीनामा का देत आहेत? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देत इतर पक्षांसोबत जाणारे हे नेते संघाचे किंवा मूळ भाजप पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. सन 2017 च्या निवडणुकीत हे सपा आणि बसपाला सोडून भाजपात आले होते. राजभर, मौर्य, बिंद, प्रजापती, वर्मा, सागर यांसारखे आडनाव असलेले हे नेते अतिमागास आणि दलित प्रवर्गातून येतात. गेल्या निवडणुकीत 403 पैकी 325 जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. त्यामुळे, निवडणुकीनंतर काही नेते मंत्री बनले. मात्र, या मंत्र्यांना सन्मान मिळत नसल्याचा आरोप मंत्र्यांकडून होत आहे. वनमंत्री दारासिंह यांचा आरोप होता की, त्यांचे सचिव त्याचं काम ऐकत नाहीत. तर, मुख्यमंत्री त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत. तसेच, स्वामी प्रसाद मौर्य यांना श्रम मंत्रालय देण्यात आले होते, जे पद त्यांच्या ज्येष्ठतेनुसार योग्य वाटत नव्हते. तर, सैनी यांना राज्यमंत्रीपदाचा पदभार देण्यात आला होता. 

दरम्यान, 2016 मध्ये मौर्य यांनी भाजपमध्ये सहभागी होताना, 15 जागा मागितल्या होत्या. 2017 च्या निवडणुकीत त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली. त्यापैकी 12 नेते आमदारही बनले. पराभूत झालेल्यांमध्ये मौर्य यांच्या मुलाचाही समावेश होता. मात्र, यावर्षी मौर्य यांना केवळ 5 जागा देण्यास भाजप तयार होती. त्यामुळे, मौर्य यांनी भाजपला रामराम केला. स्वामी प्रसाद आणि दारा सिंह हे नेते लोकांशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे, केवळ मत फोडण्यातच नाही, तर उमेदवार निवडून आणण्याच ताकदही ते ठेवतात. अनुप्रिया पटेल, मौर्य आणि दारासिंह यांनी योगी आदित्यनाथ यांची तक्रारही गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा काहीही निर्णय घेऊ शकत नाहीत.   

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश