शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election Results: तीन राज्यांत भाजपाचे 'तीनतेरा', तेलंगणात TRSचा विजयाचा नगारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 18:00 IST

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मुंबई - देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसला अच्छे दिन आल्याचे चित्र दिसत आहे. तर, तीन राज्यातून भाजपाला सत्ता गमवावी लागल्याने भाजपासाठी हा निकाल चिंताजनक ठरला आहे. तेलंगणात गतवर्षीपेक्षा कमी जागा भाजपच्या पदारात पडल्या असून मिझोरमध्ये केवळ 1 जागेवर भाजपाला समाधान मानावे लागणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे कुठेतरी भाजपाच्या विजयाचा अश्वमेध रोखण्यात काँग्रेसला यश आले असे, म्हणता येईल. 

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निकालामुळे भाजपच्या विजयी रथाला ब्रेक लागला असून गुजरात अन् कर्नाटक निवडणूक निकालानंतर जल्लोष करणाऱ्या भाजपा कार्यलयात आज शांती-शांती दिसून येत आहे. राजस्थानमध्ये वसुंधराराजे यांच्या नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली. मात्र, भाजपला येथे सत्ता गमवावी लागली. तर मध्य प्रदेशमध्येही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे येथील सत्तेच्या सारीपाटावरुन पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्येही जोतिर्रादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे अच्छे दिन आल्याचे दिसून येते. तसेच, तेलंगणात भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. गतवर्षीच्या निवडणुकांमध्ये तेलंगणात भाजपाला 5 जागांवर विजय मिळाला होता. यंदा भाजपाचा एकच उमेदवार तेलंगणातून निवडणून आला आहे. तेलुगू लोकांनी भाजपला नाकारत प्रादेशिक पक्ष असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीला स्पष्टपणे स्विकारले आहे. 

छत्तीसगडमध्येही भाजपाला सत्ता राखण्यात अपयश आले आहे. छत्तीसडमध्ये काँग्रेसने मोठी आघाडी घेत एकहाती सत्ता मिळवली आहे. छत्तीसगड 2013 मध्ये 49 जागांवर विजय मिळवत भाजपाने सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 39 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, यंदा येथे उलटे चित्र पाहायला मिळत आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस 63 जागांवर विजय मिळवेल, अशी परिस्थीती आहे. तर भाजपच्या जवळपास 32 जागा कमी होणार आहेत.  

मिझोरममध्ये गतवर्षीच्या निवडणुकीत काँग्रेसने 34 जागा जिंकत सत्ता मिळवली होती. मात्र, येथून काँग्रेसला सत्ता सोडावी लागणार आहे. कारण, मिझो नॅशनल फ्रंटने स्पष्ट बहुमत मिळविल्याचे दिसून येत आहे. येथे बहुमताचा आकडा 21 असून एमएनएफची 26 जागांवर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.  

देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालांची सद्यस्थिती. 

एकूण जागा - १९९बहुमताचा आकडा - १०१भाजपा - ७२ (-९१)काँग्रेस - १०१ (+८०)इतर - २६

मध्य प्रदेश 

एकूण जागा - २३० बहुमताचा आकडा - ११६भाजपा - १०४ (-६१)काँग्रेस आघाडी - ११७ (+५९)बसपा - २इतर - ७

छत्तीसगड 

एकूण जागा - ९०बहुमताचा आकडा - ४६भाजपा - १७ (-३२)काँग्रेस - ६३ (+२४)बसपा+ - 4 इतर - ५

तेलंगणा 

एकूण जागा - ११९बहुमताचा आकडा - ६० टीआरएस - ८७ (+२४)काँग्रेस + टीडीपी - २२ भाजपा - १ (-४)इतर - ९

मिझोरम

एकूण जागा - ४०बहुमताचा आकडा - २१काँग्रेस - ५मिझो नॅशनल फ्रंट - २६भाजपा+ - 1इतर - ८

या पाचपैकी एकाही राज्यात भाजपाला सत्ता मिळविण्यात यश आले नाही. तर, राजस्थान, मध्य प्रदेश अन् मिझोरमध्ये सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे या पाच राज्यांच्या निकाल भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरु शकतो. विशेष म्हणजे तेलंगणात तेलुगू जनतेनं भाजपाला स्पष्टपणे नाकारलं आहे. तेलंगणात भाजपला अद्याप केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. तर मिझोरमध्येही एका जागेवर भाजपा आघाडीवर आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालBJPभाजपाRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकTelanganaतेलंगणा