पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक घोषित
By Admin | Updated: December 21, 2014 23:49 IST2014-12-21T23:49:31+5:302014-12-21T23:49:31+5:30

पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक घोषित
>* ६ जानेवारीला उमेदवारी अर्जांची अंतिम मुदत* २४ जानेवारीला मतदान व २५ ला मतमोजणी(लोगो)२११२२०१४-आयसीएच-०२इचलकरंजी : येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ जानेवारी २०१५ असून, मतदान २४ जानेवारीला होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्था विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी आज, रविवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, संचालकांच्या १४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.पंचगंगा सहकारी साखर कारखाना हा जिल्ातील सर्वांत जुना सहकारी क्षेत्रातील साखर कारखाना आहे. स्थापनेपासून हा कारखाना संस्थापक अध्यक्ष रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या अधिपत्याखाली राहिला. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या रजनीताई मगदूम यांनी काही काळ या कारखान्याच्या अध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळला. सध्या पी. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ कारखान्याचे कामकाज चालवीत आहे. तसेच हा कारखाना रेणुका शुगर्स या खासगी संस्थेकडे भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आला आहे.कारखान्याचे कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्ातील हातकणंगले, शिरोळ व करवीर या तीन तालुक्यांत असून, बेळगाव (कर्नाटक) जिल्ातील चिकोडी तालुक्यातसुद्धा कारखान्याचे सभासद आहेत. त्यामुळे या कारखान्यास बहुराज्य अधिनियम लागू असून, त्यानुसार कारखान्यावर उत्पादक सभासदांतून बारा, तर अनुत्पादक सभासदांतून दोन असे चौदा संचालक निवडून दिले जातात. अनुत्पादक सभासदांमध्ये संस्था व व्यक्ती असे दोन गट आहेत. उत्पादक सभासदांची संख्या सुमारे २४ हजार, तर अनुत्पादक सभासदांची संख्या एक हजार आहे.पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक निवडणुकीसाठी ३० डिसेंबर ते ५ जानेवारी अशी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. अर्जांची छाननी ६ जानेवारीला होणार असून, त्याचदिवशी पात्र उमेदवारांची यादी जाहीर होईल. उमेदवारी माघार घेण्यासाठी १२ जानेवारीची मुदत असून, १३ जानेवारीला चिन्ह वाटप होणार आहे. बहुराज्य कायद्यानुसार निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांची घोषणा १४ जानेवारीला होणार्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे. निवडून देण्यापेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असतील तर याच सभेत मतदान दिनांक व स्थळ जाहीर करण्यात येईल. मतदान २४ जानेवारीला व मतमोजणी २५ जानेवारीला होणार आहे. (प्रतिनिधी)चौकटमगदूम गट शांत; मात्र नवीन गटाचा उदयपंचगंगा साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रत्नाप्पाण्णा कुंभार हयात असताना कुंभार गटातच दुफळी पडल्याने त्यावेळी कुंभार व यड्रावकर असे ध्रुवीकरण झाले होते. तेव्हा पंचगंगा साखर कारखान्याच्या झालेल्या दोन निवडणुकांमध्ये प्रचंड रणधुमाळी माजली होती. कुंभार यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये रजनीताई मगदूम व पी. एम. पाटील अशा दोन गटांत झालेल्या निवडणुकीत पाटील यांनी निर्विवाद बहुमत मिळविले. सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी मगदूम गट अद्यापही शांत आहे; पण बी. डी. पाटील या नवीनच गटाने उचल खाल्ली असून, त्यांनी विद्यमान अध्यक्ष पाटील गटाच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.