शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:48 IST

निवडणूक आयोगाने राहुल गांधींना शपथ पत्रावर सही करण्यास नाहीतर देशाची माफी मागण्यास सांगितले आहे.

Election Commission on Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत भाजप व निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत काही पुरावे सादर केले आहेत. देशभरात निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून हा लोकशाहीवर हल्ला आहे. भाजप व निवडणूक आयोग बनावट मतदार तयार करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगानेही आता प्रत्युत्तर दिलं आहे. प्रतिज्ञापत्रावर सही करा किंवा देशाची माफी मागा असे दोन पर्याय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना दिले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी प्रेझेंटेशन देत निवडणूक आयोगावर मतदार यादीत घोटाळा केल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी कर्नाटकात एक लाख मते   चोरीला गेल्याचे म्हटले. त्यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींना एक शपथपत्र पाठवून ते जे काही बोलत आहेत ते बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. जर ते चुकीचे आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही निवडणूक आयोगाने म्हटलं. मात्र या शपथपत्राबाबत राहुल गांधी किंवा काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा राहुल गांधींना कागदावर स्वाक्षरी करण्याचे किंवा देशाची माफी मागण्याचे पर्याय दिले आहेत.

जर राहुल गांधींना वाटत असेल की त्यांचे विश्लेषण बरोबर आहे आणि आमच्यावर केलेले आरोप बरोबर आहेत, तर त्यांना ते शपथपत्रात समाविष्ट करण्यास काहीच हरकत नसावी. जर राहुल गांधी कागदावर स्वाक्षरी करत नसतील तर याचा अर्थ असा की त्यांना स्वतःच्या शब्दांवर विश्वास नाही. त्यांना वाटत नसेल की त्यांचे विश्लेषण बरोबर आहे. यावरून त्यांचे दावे खोटे आहेत हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत, त्यांनी खोटे आरोप केल्याबद्दल आणि निवडणूक व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी केल्याबद्दल देशाची माफी मागावी, असं निवडणूक आयोगाने म्हटलं.

निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दोन पर्याय दिले आहेत, एकतर त्यांनी कागदपत्रावर सही करावी किंवा देशाची माफी मागावी. मात्र राहुल गांधी आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेनंतर या प्रकरणाबाबत काँग्रेस बंगळुरूमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी पुन्हा निवडणूक आयोगावर आरोप केले आणि वेळ बदलल्यावर शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस