शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:48 IST

निवडणूक आयोगाने राहुल गांधींना शपथ पत्रावर सही करण्यास नाहीतर देशाची माफी मागण्यास सांगितले आहे.

Election Commission on Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत भाजप व निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप करत काही पुरावे सादर केले आहेत. देशभरात निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून हा लोकशाहीवर हल्ला आहे. भाजप व निवडणूक आयोग बनावट मतदार तयार करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगानेही आता प्रत्युत्तर दिलं आहे. प्रतिज्ञापत्रावर सही करा किंवा देशाची माफी मागा असे दोन पर्याय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना दिले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी प्रेझेंटेशन देत निवडणूक आयोगावर मतदार यादीत घोटाळा केल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी कर्नाटकात एक लाख मते   चोरीला गेल्याचे म्हटले. त्यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींना एक शपथपत्र पाठवून ते जे काही बोलत आहेत ते बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. जर ते चुकीचे आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही निवडणूक आयोगाने म्हटलं. मात्र या शपथपत्राबाबत राहुल गांधी किंवा काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा राहुल गांधींना कागदावर स्वाक्षरी करण्याचे किंवा देशाची माफी मागण्याचे पर्याय दिले आहेत.

जर राहुल गांधींना वाटत असेल की त्यांचे विश्लेषण बरोबर आहे आणि आमच्यावर केलेले आरोप बरोबर आहेत, तर त्यांना ते शपथपत्रात समाविष्ट करण्यास काहीच हरकत नसावी. जर राहुल गांधी कागदावर स्वाक्षरी करत नसतील तर याचा अर्थ असा की त्यांना स्वतःच्या शब्दांवर विश्वास नाही. त्यांना वाटत नसेल की त्यांचे विश्लेषण बरोबर आहे. यावरून त्यांचे दावे खोटे आहेत हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत, त्यांनी खोटे आरोप केल्याबद्दल आणि निवडणूक व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी केल्याबद्दल देशाची माफी मागावी, असं निवडणूक आयोगाने म्हटलं.

निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दोन पर्याय दिले आहेत, एकतर त्यांनी कागदपत्रावर सही करावी किंवा देशाची माफी मागावी. मात्र राहुल गांधी आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेनंतर या प्रकरणाबाबत काँग्रेस बंगळुरूमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी पुन्हा निवडणूक आयोगावर आरोप केले आणि वेळ बदलल्यावर शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस