शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अंतर्गत मतभेद उघड केल्यास जीविताला धोका, निवडणूक आयोगाचे अजब उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 12:26 IST

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केलेच्या तक्रार प्रकरणी मोदी आणि शहा यांना निवडणूक आयोगाने सर्वच प्रकरणात क्लीन चिट दिली होती.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहिता भंग प्रकरणात निर्दोष ठरवण्याची प्रक्रिया नेमकी काय होती हे सांगण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. ही माहिती उघड केल्यास कुणाच्या तरी जीवितीला धोका पोहोचू शकतो, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मात्र कुणाच्या जीवाला धोका आहे, याचा उल्लेख करण्यास निवडणूक आयोगाने टाळले आहे.

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केलेच्या तक्रार प्रकरणी मोदी आणि शहा यांना निवडणूक आयोगाने सर्वच प्रकरणात क्लीन चिट दिली होती. मात्र मोदींना क्लीन चीट देण्याच्या निर्णयात निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मतभेद व्यक्त करणारा निकाल दिला होता. लवासा यांनी त्यावेळी दिलेला निर्णयाचा तपशील जाहीर करण्याची मागणी, पुणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी केली होती. माहिती अधिकारात केलेल्या या मागणीला उत्तर देताना निवडणूक आयोगाने माहिती देता येणार नसल्याचा खुलासा केला आहे. ही माहिती उघड केल्यास कुणाच्या तरी जीविताला धोका पोहोचू शकतो, असे कारण आयोगाने दिले आहे.

महाराष्ट्रातील वर्धा येथे निवडणूक प्रचार सभेत संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायनाडमध्ये अल्पसंख्याक मतदार अधिक असल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तेथून निवडणूक लढत असल्याचं म्हटलं होतं. तसेच, लातूर येथील सभेत सैनिकाच्या नावाने मतदान मागितले असल्याचा आरोप सुद्धा काँग्रेसने मोदींवर केला होता. त्यांनतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल केली होती.