शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, दिले असे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 16:36 IST

Election Commission of India: लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना एका निवडणूक आयुक्तांनी राजीनामा  दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील समितीने तातडीची बैठक घेऊन दोन नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली होती.

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना एका निवडणूक आयुक्तांनी राजीनामा  दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील समितीने तातडीची बैठक घेऊन दोन नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली होती. दरम्यान, या नव्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. या संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने दोन नव्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला स्थगिती देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, कारण असं केल्यास अंधाधुंदी निर्माण होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  

फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयुक्त अनूपचंद्र  पांडे हे निवृत्त झाले होते. तर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी ८ मार्च रोजी अचानक राजीनामा दिला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर सरकारने तातडीने पावलं उचलली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील समितीची बैठक होऊन ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. दरम्यान, या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना या दोन्ही निवडणूक आयुक्तांविरोधात कुठलेही आरोप नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणात आम्ही हस्तक्षेप करणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. निवडणुका तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत आम्ही हस्तक्षेप केला, तर अंदाधुंदी निर्माण होऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

मात्र याचिका फेटाळून लावण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. केवळ दोन तासांमध्ये २०० लोकांची छाननी कशी काय झाली, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने सरकारला विचारला होता. विरोधी पक्ष नेत्यांना आणखी वेळ दिला गेला पाहिजे होता का, असा प्रश्न न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी एसजींना विचारला. २०० नावांची छाननी करण्यासाठी केवळ दोन तास दिले गेले, पारदर्शकता केवळ अजून चालत नाही तर ती दाखवली गेली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावले होते.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४