शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

'नीती'ला निवडणूक आयोगाची नोटीस; काँग्रेसचा टाळे ठोकण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 22:02 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक अजेंड्यावर आज भाष्य केले. यावेळी त्यांनी या अजेंड्यामध्ये योजना एका व्यक्तीची नाही, तर जनतेचा आवाज असणार असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी किमान उत्पन्न योजना जाहीर करत निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. मात्र, यावर नीती आयोगाने केलेल्या टीकेविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यावर आयोगाने नीती आयोगाला नोटीस पाठविली आहे. तर राहुल गांधी यांनी ही न्याय योजना जनतेचा आवाज असून सत्तेत आल्यानंतर नीती आयोगावाच टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक अजेंड्यावर आज भाष्य केले. यावेळी त्यांनी या अजेंड्यामध्ये योजना एका व्यक्तीची नाही, तर जनतेचा आवाज असणार असल्याचे सांगितले. यामध्ये रोजगाराभिमुख, शेती संकट दूर करण्यासाठी तसेच आरोग्य, शिक्षणासह अर्थव्यवस्था मजबूत करण्यासंबंधी घोषणा असणार असल्याचे सांगितले. तसेच न्याय योजनेवर टीका करणाऱ्या नीती आयोगालाही सत्तेत आल्यास बंद करणार असल्याचे ते म्हणाले.

तर दुसरीकडे काँग्रेसवर टीका करणाऱ्या नीती आयोगाच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली असून राजीव कुमार यांनी देशाबाहेर असल्याने यासाठी 5 एप्रिलपर्यंतचा वेळ मागितला आहे. 

राहुल गांधी हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी उद्योजकांना कर दहशतवादातूनही मुक्त करणार असल्याचे सांगितले. 

राहुल गांधी यांनी ट्विट करत सत्तेत आल्यानंतर नीती आयोगाला बंद करण्यात येईल. या बदल्यात योजना आयोगाला आणण्यात येईल, ज्यामध्ये प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, विशेषज्ञ असतील. यांची संख्या 100 पेक्षा कमी असेल. नीती आयोगाकडे कोणतेही काम नाही. यामुळे ते सरकारच्या प्रचारासाठी खोटी आकडेवारी देत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना आयोग बंद करून नीती आयोग सुरु केला होता. 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक